AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loudspeaker Row : भोंग्याचा वाद शिगेला… आता बच्चू भाऊ विना भोंग्यांची निवडणूक लढवणार! चिन्ह माहिती होण्यासाठी फक्त एक दिवस भोंगा वाजणार

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोंग्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर सडकून टीका करण्यास सुरूवात केली आहे. भाजप मात्र या भूमिकेचं खुलेपणे समर्थन करत आहे. अशातच आता बच्चू कडू यांनी निवडणुकीतही भोंग न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Loudspeaker Row : भोंग्याचा वाद शिगेला... आता बच्चू भाऊ विना भोंग्यांची निवडणूक लढवणार! चिन्ह माहिती होण्यासाठी फक्त एक दिवस भोंगा वाजणार
राज्यमंत्री बच्चू कडूImage Credit source: tv9
| Updated on: May 04, 2022 | 9:32 PM
Share

अकोला : राज्यात सध्या भोंग्याचा वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता बच्चू कडू (Bacchu Kadu) विना भोंग्यांची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. चिन्हं माहिती होण्यासाठी फक्त एक दिवस भोंगा वाजणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच भोंगे बंद करायचे तर सर्वच करा, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे. एकिकडे मशीदीवरील भोंग्यांवरून मनसेने रान पेटलं असताना बच्चू कडू (Loudspeaker Row) यांनी अशी भूमिका घेतल्याने आता पुन्हा राजकीय चर्चांणा उधाण आले. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोंग्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर सडकून टीका करण्यास सुरूवात केली आहे. भाजप मात्र या भूमिकेचं खुलेपणे समर्थन करत आहे. अशातच आता बच्चू कडू यांनी निवडणुकीतही भोंग न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

भोंग्यांवरून जोरदार राजकीय वादंग

याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, मंदिर,मशीदमधले भोंगे बंद कराल तर सर्वच भोंगे बंद करावे लागतील. मात्र सर्वात जास्त त्रास राजकीय भोंग्याचा होतो ते आधी बंद करा, असे आवाहनही त्यांनी करून टाकलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत बच्चू कडू एकच दिवस भोंगा वाजवणार बाकी दिवस विना भोंग्याचा प्रचार करणार, हे आता स्पष्ट झालं आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणूक लागल्यावरच हे किती पाळलं जातं कळेल. सध्या राज्यात यावरून जोरदार राजकीय वादंग सुरू आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडी आमनेसामने आले आहे. राज्यात दंगली भडकावण्याचा भाजपचा डाव आहे. आणि त्यांना या माध्यमातून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे, असा आरोपही आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय.

गृहमंत्री भोंग्याबाबत काय म्हणाले?

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनधिकृत भोंग्यांबाबत पोलिस आयुक्त निर्णय घेतील, तसेच कोणत्याही परिस्थितीला सामोर जायला मुंबई पोलिस सक्षम आहेत. पोलिसांनी आज चांगल उत्तम बंदोबस्त ठेवला. तसेच सर्व समाजातील लोकांनी सहकार्य केलं. तसेच गाईडलाईनच पालन केल आहे. हे असच सुरु राहील, अशी प्रतिक्रिया या वादावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

वडेट्टीवार यांची राज ठाकरेंवर सडकून टीका

मंत्री विजय वडेट्टीवर यांनी यावरून राज ठाकरेंवर टीका केली आबहे. ज्या पद्धतीने राज ठाकरे सरसावले मला वाटतं त्यांना जनता कधी माफ करणार नाही. या राज्यात अचानक उठून कुणीतरी भोंगे विषय काढावा हे लोकांना मान्य नाही. खोटं बोलायची सवय आता त्यांनी सोडून द्यावी. टिळकांचा नातू येऊन विरोध करतो. जे जेम्स लेनचे समर्थन करतात त्यांना राजकारणातून जनता हद्दपार करेल. जातीयवादी कोण आहे हे राज्याने पाहिले. सुपारी बाज कोण आहे हे लोकांना माहिती. राज ठाकरे यांची भूमिका तरुणांना खड्ड्यात टाकणारी आहे, अशी टीका वडेट्टीवर यांनी केली आहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....