AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांना जामीन, त्यानंतर नेमकं काय घडलं

शाईफेक करण्यात आल्यानंतर कलम ३०७ अर्थात हत्येचा प्रयत्न करणे, असा गुन्हा दाखल करण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांना जामीन, त्यानंतर नेमकं काय घडलं
| Updated on: Dec 14, 2022 | 10:31 PM
Share

मुंबई : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांवर वक्तव्य केलं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या शाईफेक करणाऱ्या तिघांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत मिरवणूक काढली. मनोज गडबडे, विजय ओव्हाड आणि धनंजय इजगज यांची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका झाली. त्यानंतर पिंपरी येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जामिनावर सुटका झालेल्यांना हार अर्पण केला. त्यानंतर फुलं उधळत शाईफेक करणाऱ्यांना खांद्यावर घेत जल्लोष करण्यात आला.

महापुरुषांबद्दलचे अपशब्द काढले तर ते सहन करून घेतले जाणार नाहीत. हे कालच्या प्रसंगातून सिद्ध झालेलं आहे. देशातील कायद्याच्या आधारे तीनही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे, असं जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी सांगितलं.

याबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले, यासंदर्भात लावण्यात आलेली ३०७ ची केस ही चुकीचीच होती. सरकार हे मायबाप सरकार असतं. सरकार मायाळू, दयाळू, प्रेमळ पाहिजे. सरकारला राग येताच कामा नये.

चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांवर केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

शाईफेक करण्यात आल्यानंतर कलम ३०७ अर्थात हत्येचा प्रयत्न करणे, असा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याविरोधात आवाज उठविण्यात आल्यानंतर सरकारनं ३०७ चा गु्न्हा मागे घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाईफेक करणाऱ्यांची जामिनावर सुटका झाली.

सत्तेचा गैरवापर करून खोटी कलमं लावण्यात आली होती. ही खोटी कलमं उठविल्यानंतर जामीन मिळाला. त्यानंतर तो कुटुंबीयांचा तो आनंद होता. ते काही भाजपला किंवा चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यासारखं नसल्याचं राष्ट्रवादीच्या वतीनं सांगण्यात आलंय.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.