बंजारा समाज 27 फेब्रुवारीला मुंबईत धडकणार, आझाद मैदानावर मोर्चा

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे. त्या अहवालाच्याआधारे मुख्यमंत्री पुढची कारवाई करतील. | Haribhau Rathod

बंजारा समाज 27 फेब्रुवारीला मुंबईत धडकणार, आझाद मैदानावर मोर्चा
बंजारा समाजाकडून येत्या 27 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती हरिभाऊ राठोड यांनी दिली. भालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू' या कादंबरीवर बंदी घालावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 8:07 AM

नांदेड: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ठरवतील, अशी प्रतिक्रिया बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली. ते गुरुवारी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Banjara community organize protest march on 27 february in Mumbai)

यावेळी त्यांना संजय राठोड यांच्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा हरिभाऊ राठोड यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे. त्या अहवालाच्याआधारे मुख्यमंत्री पुढची कारवाई करतील. मंत्री संजय राठोड यांच्याबाबत जितकी माहिती माध्यमांना आहे तितकंच मलाही माहिती असल्याचे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले.

बंजारा समाजाचा 27 फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा

बंजारा समाजाकडून येत्या 27 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती हरिभाऊ राठोड यांनी दिली. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ या कादंबरीवर बंदी घालावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘हिंदू’ या कादंबरीत बंजारा समाजाबाबत आक्षेपार्ह लिखाण आहे, त्यामुळे या कादंबरीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

संजय राठोडांचा पोहरादेवी दौरा लांबणीवर

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे (Pooja Chavan Suicide) वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा पोहरादेवी दौरा लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. संजय राठोड हे गुरुवारी पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे नेते आणि धर्मगुरुंच्या साक्षीने आपली बाजू मांडणार, असे सांगितले जात होते. मात्र, आता हा दौरा लांबणीवर पडला आहे.

बहुजन समाजाच्या नेत्याला संपवण्याचे षडयंत्र; संजय राठोडांना गोवलं जातंय: बंजारा धर्मगुरु

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan) संजय राठोड यांना जाणुनबुजून गोवले जात आहे. या माध्यमातून बहुजन समाजातील आणखी एक नेतृत्त्व संपवण्याचा डाव असल्याचा आरोप बंजारा समाजाच्या धर्मगुरुंकडून करण्यात आला होता. वेळ पडल्यास संजय राठोड यांच्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशाराही बंजारा समाजाच्या नेत्यांकडून देण्यात आला होता.

संबंधित बातम्या:

Sanjay Rathod Resignation Live Updates: संजय राठोड यांचा राजीनामा निष्पक्ष चौकशीसाठी: सूत्रांची माहिती

पूजा अरुण राठोड कोण?, मेडिकल रिपोर्ट काय सांगतो?, नांदेडशी कनेक्शन काय?; वाचा सविस्तर रिपोर्ट!

(Banjara community organize protest march on 27 february in Mumbai)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.