AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चालकाचा ताबा सुटला अन् बस थेट घाटात कोसळली, दैव बलवत्तवर म्हणून…

राज्य परिवहन महामंडळाची बस अंबाजोगाईहून मोरफळी येथे चालली होती. अंबाजोगाईजवळील बुट्टेनाथ घाटात बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.

चालकाचा ताबा सुटला अन् बस थेट घाटात कोसळली, दैव बलवत्तवर म्हणून...
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 18, 2023 | 5:48 PM
Share

बीड / महेंद्र मुधोळकर : अंबाजोगाई येथील आगाराची अंबाजोगाई-मोरफळी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस बुट्टेनाथ घाटात पलटी झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. दैव बलवत्तर म्हणून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

बुट्टेनाथ घाटात चालकाचे नियंत्रण सुटले

राज्य परिवहन महामंडळाची बस अंबाजोगाई येथून येल्डा मार्गे चिचखंडी, मोरफळीला चालली होती. अंबाजोगाई लगत असलेल्या बुट्टेनाथ घाटात येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् बस घाटात पलटी झाली. बसमध्ये 30 प्रवाशी प्रवास करत होते. बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

अपघात घडताच नागरिकांनी 108 क्रमांकला फोन केल्याने अंबाजोगाई येथील रुग्णवाहिकामधून जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. सुदैवाने जीवितहानी न झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

नंदुरबारमध्ये बस आणि दोन ट्रकमध्ये अपघात

नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात धुळ्याहून – सुरतच्या दिशेने जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. बस आणि दोन ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. कोंडाईबारी घाटात नेहमी अपघाताच्या घटना घडतात. मात्र महामार्ग प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नाही. या महामार्गावर दिशादर्शक फलक नाही. हेच अपघाताच्या सर्वात मोठे कारण आहे.  या जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Follow Us
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?.
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......