AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडला लागोपाठ दुसरा धक्का, कोर्टाचा मोठा निर्णय, बीड सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट

वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. असं असलं तरीही कोर्टाने वाल्मिक कराड याचा ताबा एसआयटीला देण्याबाबतची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

वाल्मिक कराडला लागोपाठ दुसरा धक्का, कोर्टाचा मोठा निर्णय, बीड सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 14, 2025 | 4:24 PM
Share

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मिक कराड याच्या कोठडीबाबत आज केज कोर्टात सुनावणी पार पडली. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. असं असलं तरी एसआयटीने हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा ताबा आपल्याला मिळावा अशी मागणी कोर्टात केली. विशेष म्हणजे कलम 302 प्रकरणात वाल्मिक कराड याला मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर केज कोर्टाने वाल्मिक कराड याचा एसआयटीकडे ताबा देण्याची मागणी मान्य केली. त्यामुळे वाल्मिक कराड याच्यासाठी हा मोठा धक्का आहे. हत्येच्या गुन्ह्यात सीआयडीने  त्याच्यावर प्रोडक्शन वॉरंट जारी केलं आणि कोर्टाने ते मंजूर केलं. त्यामुळे सीआयडीकडे वाल्मिक कराडचा ताबा मिळाला आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर वाल्मिक कराड याच्या पोलीस कोठडीसाठी उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. यावेळी त्याच्या पोलीस कोठडीबाबत युक्तिवाद केला जाणार आहे.

वाल्मिक कराडच्या वकिलांची महत्त्वाची प्रतिक्रिया

केज कोर्टाच्या निकालानंतर वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी माध्यांना प्रतिक्रिया दिली. “सीआयडीच्या कस्टडीत घेतलं. दुसऱ्या गुन्ह्यात. आम्ही चॅलेंज करणार. खंडणीच्या गुन्ह्यात काही आढळलं नाही. एसआयटीने त्यांना का घेतलं? कशासाठी घेतलं? आमच्याकडे प्रत आल्यावर पाहू. उद्या कागदपत्र मिळाल्यावर आम्ही बाजू मांडू. २९ मे रोजी कोणत्या तरी आरोपीची केस होती. त्यात कराड नव्हते. आता त्यांचं नाव गोवण्यात आलं आहे. त्यावर आम्ही बाजू मांडणार आहोत. उद्या रिमांड मिळेल. त्यावर आम्ही बोलू. २९/11 पासून कोणतीही तक्रार नाहीये. वाल्मिक कराडचं कशातच नाव नाही. तरीही त्यांचं नाव टाकलं गेलंय”, असा आरोप वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला.

“एसआयटीच्या ताब्यात आहे की सीआयडीच्या ताब्यात माहीत नाही. प्रोडक्शन आणलं जातं. त्यात कुणालाही बोलता येत नाही. उद्या रिमांडला आणलं जाईल तेव्हा बघू. कोणत्या आधारे ताब्यात घेतलं ते माहीत नाही. आज आम्हाला कोणतीच माहिती नाही. मोक्का संदर्भातील कोणतेही कागदपत्र आमच्याकडे नाही. सीआयडीने प्रोडक्शन दाखल केलं. त्या बेसवर कोर्टाने प्रोडक्शन मंजूर केलं आहे. कोणत्याही माणसाच्या प्रॉपर्टीसाठी पोलीस कोठडी गरजेची नाही असं आम्ही सांगितलं. आमचा युक्तिवाद ग्राह्य धरला आहे”, अशी प्रतिक्रिया वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली.

Follow Us
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल