AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SC hearing MLA Disqualification : ‘निकालानंतर बरच काही घडणार’, शिंदे सरकारमधील मंत्र्याच सूचक विधान

SC hearing MLA Disqualification : सर्वोच्च न्यायालय आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर महत्वपूर्ण निकाल देणार आहे. संपूर्ण देशाच लक्ष या निकालाकडे लागलं आहे.

SC hearing MLA Disqualification : 'निकालानंतर बरच काही घडणार', शिंदे सरकारमधील मंत्र्याच सूचक विधान
Image Credit source: tv9
| Updated on: May 11, 2023 | 11:05 AM
Share

नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाच लक्ष लागलं आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बरेच महिने या खटल्यावर न्यायालयात सुनावणी सुरु होती. अखेर आज या खटल्यावर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

शिंदे गटाचे 16 आमदार पात्र ठरतात, की अपात्र यावर बरच काही अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालायच्या निकालावर राज्यातील राजकारणाची पुढची दिशा ठरु शकते. त्यामुळे या निकालाची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे.

निकालाआधी खूप महत्वाचे बोलले

आज सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन होणार आहे. त्याआधी शिंदे-फडवणीस सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खूप महत्वाच विधान केलय. निकालानंतर भरपूर घडामोडी घडतील, अस सूचक विधान त्यांनी केलय. “उद्धव ठाकरे गटाचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. याची प्रचिती एक-दोन महिन्यात येईल. मागचे पंधरा दिवस सांगतोय त्यावर शिक्कामोर्तब होईल” असं उदय सामंत म्हणाले.

संजय राऊतांवर काय म्हणाले?

आज निकालाच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आलीय. त्यावर उदय सामंत यांनी, नोटीस आली असल्यास, योगायोग समजावा असं उत्तर दिलं. निकालाआधी खासदार, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या टि्वटबद्दल प्रतिक्रिया विचारली. त्यावर, नव कवींना माझ्या शुभेच्छा असं ते म्हणाले. “रोज सकाळी राऊंताची टेप वाजते. शिल्लक उरलेल्या आमदार-खासदारांना सांभाळण्यासाठी कुठल्यातरी नेत्याने बोललं पाहिजे, म्हणून ते बोलतात. संजय राऊंताव्यतिरिक्त महाराष्ट्रात अनेक विकासाचे मुद्दे आहेत” असं उदय सामंत म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.