AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाल्याच्या पुरातून वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला; राखी घेऊन जात असताना घडली होती दुर्घटना; सिलेगावमधील घटना

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सिलेगाव येथील धोंडी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा तीन दिवसानंतर मृतदेह आढळला आहे. मंगळवारी नाला पार करताना दुचाकीसह ते वाहून गेले होते, या नाल्यात वाहून नाल्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव राधेश्याम बळीराम सांगोळे ( वय 52, रा. तिरोडा) आहे.

नाल्याच्या पुरातून वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला; राखी घेऊन जात असताना घडली होती दुर्घटना; सिलेगावमधील घटना
| Updated on: Aug 20, 2022 | 9:53 AM
Share

भंडाराः सध्या राज्यातील विविध भागात प्रचंड पाऊस (Heavy Rain) सुरू आहे, त्यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागात पावसामुळे अनेक नदी नाल्यांवर पूर आल्याने नागरिकांना प्रवास करणे अवघड बनले होत, तरीही काही भागात नाल्यावर पाणी येऊन त्यातून प्रवास करत असल्याने दुर्देवी घटना घडल्या आहेत. याप्रकारची घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर (Tumsar Bhandara) तालुक्यात घडली आहे. सिलेगावातील (Silegaon) धोंडी नाल्यावर पाणी असतानाही त्यातून सिहोरामार्गे मध्य प्रदेशातील बोनकट्टा येथे जात असताना दोघे जण पाण्यातून वाहून गेले होते, त्यापैकी एक जण पाण्यातून पोहत बाहेर आला होता, मात्र एकाचा 16 तारखेपासून पत्ता लागला नव्हता, त्या व्यक्तीचा आज मृतदेह आढळून आला आहे. राखी घेऊन जात असताना ही दुर्घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सिलेगाव येथील धोंडी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा तीन दिवसानंतर मृतदेह आढळला आहे. मंगळवारी नाला पार करताना दुचाकीसह ते वाहून गेले होते, या नाल्यात वाहून नाल्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव राधेश्याम बळीराम सांगोळे ( वय 52, रा. तिरोडा) आहे.

पुरातून दोघेही वाहून गेले

या महिन्याच्या 16 ऑगस्ट रोजी राधेश्याम आपला मित्र विशाल गजभिये याच्यासोबत सिहोरामार्गे मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथे मामाच्या गावी राखी घेऊन जात होते. त्यावेळी सिलेगाव येथील धोंडीनाला पार करताना पुलावरील पाण्याचा अंदाज आला नसल्याने दोघेही दुचाकीसह वाहून गेले होते, मात्र विशाल पुरातून सुरक्षित बाहेर आला होता. तर राधेश्याम वाहून गेला होता.

गेल्या तीन दिवसांपासून शोध

वाहून गेले त्यादिवसांपासून त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र तब्बल तीन दिवसानंतर धोंडी नाल्यातील झुडूपामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी सिहोरा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास हवालदार इळपाते करीत आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.