AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आमच्यासाठी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे”; काँग्रेसने राहुल गांधी यांच्या कारवाईचं कारण स्पष्ट सांगितले..

राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने खोटे आरोप लावून लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तसेच दोन वर्ष जेलचे शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्यामुळेच आमची हुकूमशाविरुद्ध ही लढाई सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

आमच्यासाठी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे; काँग्रेसने राहुल गांधी यांच्या कारवाईचं कारण स्पष्ट सांगितले..
| Edited By: | Updated on: Mar 28, 2023 | 4:08 PM
Share

भंडारा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाकडून दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर त्यानंतर लोकसभा अध्यक्षानी राहुल गांधी यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. या दोन्ही प्रकरणामुळे काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत काँग्रेसकडून आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी दिला आहे. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविषयी बोलताना सांगितले की, देशात अनेक प्रश्न आहे.

महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनत आहे. या प्रश्नांवर काँग्रेसकडून आणि मित्र पक्षाकडून वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जनतेच्या प्रश्नांना काँग्रेसकडून वाचा फोडली जात असल्यामुळेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली गेली आहे.

आमच्यासाठी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामुळे भाजपकडून जरी कारवाईचा इशारा देण्यात आला असला तरी आम्ही त्याच्यावर आवाज उठवत राहू असा इशाार नाना पटोले यांनी दिला आहे.

देशात अनेक प्रश्न गंभीर बनत असताना नको त्या विषयाकडे भाजप लक्ष वेधून घेत आहे. देशात बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनत असताना राहुल गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली आहे. कारण लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच असे प्रकार केले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली गेली असली तरी त्याविरोधात आम्ही आवाज उठवत राहु. त्याचबरोबर जनतेचे प्रश्न घेऊनच काँग्रेस लढणार आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने खोटे आरोप लावून लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तसेच दोन वर्ष जेलचे शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्यामुळेच आमची हुकूमशाविरुद्ध ही लढाई सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.