AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आमच्यासाठी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे”; काँग्रेसने राहुल गांधी यांच्या कारवाईचं कारण स्पष्ट सांगितले..

राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने खोटे आरोप लावून लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तसेच दोन वर्ष जेलचे शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्यामुळेच आमची हुकूमशाविरुद्ध ही लढाई सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

आमच्यासाठी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे; काँग्रेसने राहुल गांधी यांच्या कारवाईचं कारण स्पष्ट सांगितले..
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 28, 2023 | 4:08 PM
Share

भंडारा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाकडून दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर त्यानंतर लोकसभा अध्यक्षानी राहुल गांधी यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. या दोन्ही प्रकरणामुळे काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत काँग्रेसकडून आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी दिला आहे. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविषयी बोलताना सांगितले की, देशात अनेक प्रश्न आहे.

महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनत आहे. या प्रश्नांवर काँग्रेसकडून आणि मित्र पक्षाकडून वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जनतेच्या प्रश्नांना काँग्रेसकडून वाचा फोडली जात असल्यामुळेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली गेली आहे.

आमच्यासाठी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामुळे भाजपकडून जरी कारवाईचा इशारा देण्यात आला असला तरी आम्ही त्याच्यावर आवाज उठवत राहू असा इशाार नाना पटोले यांनी दिला आहे.

देशात अनेक प्रश्न गंभीर बनत असताना नको त्या विषयाकडे भाजप लक्ष वेधून घेत आहे. देशात बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनत असताना राहुल गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली आहे. कारण लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच असे प्रकार केले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली गेली असली तरी त्याविरोधात आम्ही आवाज उठवत राहु. त्याचबरोबर जनतेचे प्रश्न घेऊनच काँग्रेस लढणार आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने खोटे आरोप लावून लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तसेच दोन वर्ष जेलचे शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्यामुळेच आमची हुकूमशाविरुद्ध ही लढाई सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा