AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आमच्यासाठी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे”; काँग्रेसने राहुल गांधी यांच्या कारवाईचं कारण स्पष्ट सांगितले..

राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने खोटे आरोप लावून लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तसेच दोन वर्ष जेलचे शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्यामुळेच आमची हुकूमशाविरुद्ध ही लढाई सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

आमच्यासाठी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे; काँग्रेसने राहुल गांधी यांच्या कारवाईचं कारण स्पष्ट सांगितले..
| Edited By: | Updated on: Mar 28, 2023 | 4:08 PM
Share

भंडारा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाकडून दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर त्यानंतर लोकसभा अध्यक्षानी राहुल गांधी यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. या दोन्ही प्रकरणामुळे काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत काँग्रेसकडून आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी दिला आहे. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविषयी बोलताना सांगितले की, देशात अनेक प्रश्न आहे.

महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनत आहे. या प्रश्नांवर काँग्रेसकडून आणि मित्र पक्षाकडून वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जनतेच्या प्रश्नांना काँग्रेसकडून वाचा फोडली जात असल्यामुळेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली गेली आहे.

आमच्यासाठी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामुळे भाजपकडून जरी कारवाईचा इशारा देण्यात आला असला तरी आम्ही त्याच्यावर आवाज उठवत राहू असा इशाार नाना पटोले यांनी दिला आहे.

देशात अनेक प्रश्न गंभीर बनत असताना नको त्या विषयाकडे भाजप लक्ष वेधून घेत आहे. देशात बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनत असताना राहुल गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली आहे. कारण लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच असे प्रकार केले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली गेली असली तरी त्याविरोधात आम्ही आवाज उठवत राहु. त्याचबरोबर जनतेचे प्रश्न घेऊनच काँग्रेस लढणार आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने खोटे आरोप लावून लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तसेच दोन वर्ष जेलचे शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्यामुळेच आमची हुकूमशाविरुद्ध ही लढाई सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.