AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळणं पडलं महागात; ‘मविआ’च्या 29 जणांवर गुन्हा

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला व रस्ता अडवून धरल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळणं पडलं महागात; 'मविआ'च्या  29 जणांवर गुन्हा
| Edited By: | Updated on: Mar 28, 2023 | 3:07 PM
Share

इचलकरंजी/कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली, त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांच्यावरील कारवाई जोपर्यंत मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असल्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काँग्रेसकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधातही आंदोलन पुकारले आहे. तर आता महाविकास आघाडीने राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आता तीव्र आंदोलन छेडले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्येही महाविकास आघाडीने आणि मित्र पक्षाने एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन पुकारले आहे.

यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला. त्यामुळे इचलकरंजीमध्ये वातावरण तापले आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकपा या पक्षांतील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून पंतप्रधान नेरंद्र मोदी यांचा पुतळा जाळला होता.

त्यामुळे आता शहरातील महाविकास आघाडीच्या 29 जणांवर गाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला व रस्ता अडवून धरल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांच्या खासदारकी गेल्यामुळे केले इचलकरंजीतील केएलकेएल चौकामध्ये निदर्शने करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकपा अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.