AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळणं पडलं महागात; ‘मविआ’च्या 29 जणांवर गुन्हा

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला व रस्ता अडवून धरल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळणं पडलं महागात; 'मविआ'च्या  29 जणांवर गुन्हा
| Edited By: | Updated on: Mar 28, 2023 | 3:07 PM
Share

इचलकरंजी/कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली, त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांच्यावरील कारवाई जोपर्यंत मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असल्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काँग्रेसकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधातही आंदोलन पुकारले आहे. तर आता महाविकास आघाडीने राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आता तीव्र आंदोलन छेडले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्येही महाविकास आघाडीने आणि मित्र पक्षाने एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन पुकारले आहे.

यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला. त्यामुळे इचलकरंजीमध्ये वातावरण तापले आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकपा या पक्षांतील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून पंतप्रधान नेरंद्र मोदी यांचा पुतळा जाळला होता.

त्यामुळे आता शहरातील महाविकास आघाडीच्या 29 जणांवर गाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला व रस्ता अडवून धरल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांच्या खासदारकी गेल्यामुळे केले इचलकरंजीतील केएलकेएल चौकामध्ये निदर्शने करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकपा अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.