AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा महिन्यांपूर्वी एकुलता एक मुलगा गेला, फवारणी करताना हार्ट अटॅकने शेतकरी पित्याचा मृत्यू

स्वतःच्या मालकीच्या शेतात उन्हाळी धान पिकावर खत फवारणी करत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने भोवळ येऊन खाली पडल्यानंतर शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

सहा महिन्यांपूर्वी एकुलता एक मुलगा गेला, फवारणी करताना हार्ट अटॅकने शेतकरी पित्याचा मृत्यू
भंडाऱ्यात शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 07, 2022 | 10:31 AM
Share

भंडारा : पिकावर खत फवारणी करताना हृदयविकाराचा धक्का (Heart Attack) बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच शेतकऱ्याच्या (Farmer) मुलाचा मृत्यू झाला होता. एकामागून एक दोघे कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबाचा आधारवड कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन विवाहित मुली असा परिवार असल्याची माहिती आहे. श्रीराम आत्माराम धोटे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते 60 वर्षांचे होते. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव-कोहळी येथील शेत शिवारात ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

स्वतःच्या मालकीच्या शेतात उन्हाळी धान पिकावर खत फवारणी करत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने भोवळ येऊन खाली पडल्यानंतर शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्याच्या पिंपळगाव/कोहळी येथील शेत शिवारात घडली आहे. श्रीराम आत्माराम धोटे (वय 60 वर्ष) (रा. पिंपळगाव /कोहळी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकऱ्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे.

खताच्या फवारणीसाठी शेतात

पिंपळगाव/कोहली येथील श्रीराम आत्माराम धोटे यांनी इटियाडोह बाघ प्रकल्प सिंचन योजने अंतर्गत सव्वा एकरात उन्हाळी धान पिकाची लागवड केली होती. याच गावातीलच पंढरी नकटू कोड्डे यांच्यासोबत धान पिकावर खताची फवारणी करण्यासाठी ते सायकलने खत घेऊन गेले होते.

भोवळ येऊन कोसळले

शेतात खत फवारणी करत असताना अचानक श्रीराम धोटे यांना भोवळ आली आणि ते खाली पडले. याची माहिती मिळताच पंढरी कोड्डे त्यांना पाणी पाजण्यासाठी गेला, मात्र श्रीराम धोटे यांचा जागीच मृत्यू झाला होता.

हार्ट अटॅक आल्याचा अंदाज

या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली, यावरुन पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. लाखांदूर येथे शवविच्छेदन करून मयत शेतकऱ्याचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला आहे. शेतकऱ्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

सहा महिन्यांपूर्वी मुलाचा मृत्यू

अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच श्रीराम धोटे यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. आता कर्ता पुरुषच गेल्याने त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन विवाहित मुली असं कुटुंब आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

दोघा तरुण लेकरांचे घरात मृतदेह, पोलीस येताच आई दार लॉक करुन निघाली, अपघात की घातपात?

सुट्टीवर आलेल्या CRPF जवानाचा आनंद क्षणात लोपला, सिमेंटचा पिलर कोसळून लेकीचा करुण अंत

गवताच्या गंजीत होरपळून एकाचा होरपळून मृत्यू; नाशिकमधली काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.