AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“स्वतःच्या सोयीनुसार बोलणं ही भाजपची भूमिका”; शिंदे गटाच्या नेत्यानं पदवीधर निवडणुकीवरून भाजपवर निशाणा साधला

पु्ण्यातील कसबा पेठ्यातून काँग्रेस उमेदवार लढणार असल्याचे नाना पटोले यांनी वक्तव्य केले होते. त्यावरून महाविकास आघाडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

स्वतःच्या सोयीनुसार बोलणं ही भाजपची भूमिका; शिंदे गटाच्या नेत्यानं पदवीधर निवडणुकीवरून भाजपवर निशाणा साधला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 26, 2023 | 8:36 PM
Share

चिपळूणः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून आणि वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाबरोबर युती केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे अनेक नवनव्या चर्चेना उधान आले आहे. त्यातच पुण्यातील पोटनिवडणुकीवरूनही राजकारण तापले आहे. पु्ण्यातील पोटनिवणुकीवरून महाराष्ट्राची ही संस्कृती नाही अशी चर्चा भाजपने केली होती. त्यावर ठाकरे गटाने भाजपला सोलापूर निवडणुकीची आठवण करून देत त्यावेळी भाजपला ही संस्कृती आठवली नाही का असा सवाल ठाकरे गटाने केला होता. राज्यातील राजकीय घडामोडींना वेगवेगळ्या घटनांवरून प्रचंड वेग आला आहे.

राज्यातील पदवीधर मतदार संघ आणि पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलेले असतानाच स्वतःच्या सोयीनुसार बोलणं ही भाजपची भूमिका असल्याची टीका भास्करराव जाधव यांनी केली आहे.

त्यातच आता काँग्रेसकडूनही पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीविषयी चर्चा केली जात असल्याने महाविकास आघाडी म्हणून भास्करराव जाधव यांनी सांगितले की, तिन्ही पक्षातील नेते याविषयी बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पु्ण्यातील कसबा पेठ्यातून काँग्रेस उमेदवार लढणार असल्याचे नाना पटोले यांनी वक्तव्य केले होते. त्यावरून महाविकास आघाडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

त्यावर बोलताना भास्करराव जाधव यांनी सांगितले की, त्यांनी असे म्हटले असले तरी नाना पटोले हे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्या उमेदवारीवर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे मात्र सोलापूर पोटनिवडणुकीत भाजपने का उमेदवारी भरली असा सवालही भास्करराव जाधव यांनी उपस्थित केला आहे. तर स्वतःच्या सोयीनुसार बोलणं ही भाजपची भूमिका असल्याची टीका भास्करराव जाधव यांनी भाजपवर केली आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....