AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024 ची निवडणूक ही उद्धव ठाकरेंची शेवटची, आता 2029 ला .., भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने फोडला बॉम्ब, राज्यात मोठी खळबळ

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. यावर बोलताना भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर नंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

2024 ची निवडणूक ही उद्धव ठाकरेंची शेवटची, आता 2029 ला .., भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने फोडला बॉम्ब, राज्यात मोठी खळबळ
उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 6:37 PM
Share

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, पक्षातील 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटले आहेत. हे खासदार लवकरच वेगळा गट तयार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मात्र यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने भाजपवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकाराला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. आता या आरोपाला केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले? 

शिवसेना आणि ऑपरेशन टायगर यामध्ये भाजपचा काय संबंध आला? भाजपच्या माणसाला त्याबद्दल कशाला विचारता? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.  दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्व भाजपला साथ देतात.  साथ देणारे कोणी येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला हे विचारलं नाही पाहिजे. भाजपाचं मागेपुढे काही नसतं जे आमच्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. त्यांची  2024 ची निवडणूक ही शेवटची होती, मग त्यांनी 2029 च्या निवडणुकीचं भविष्य का बघावं?  असं यावेळी मुरलीधर मोहळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुण्यामध्ये पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यावर देखील यावेळी मोहळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महानगरपालिकेमध्ये जे आमचे लोक काम करतात, प्रशासन काम करते एकूण आजची परिस्थिती पाहता पावसाने ओढ दिली आहे . धरण साखळीमध्ये पाणी कमी आहे, त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेतला असेल, असं यावर मुलरीधर मोहळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. हे सर्व खासदार आता वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटात देखील घडामोडींना वेग आला आहे.  उद्या शिवसेना ठाकरे गटाकडून खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर व्हिप देखील जारी करण्यात आला आहे.

Follow Us
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!
डोळ्यात पाणी अन्... tv9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भावूक
डोळ्यात पाणी अन्... tv9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भावूक
चार्टर्ड विमानातून दिल्ली दौरा, चाललंय तरी काय? अंजली दमानिया मैदानात
Anjali Damania | चार्टर्ड विमानातून दिल्ली दौरा, चाललंय तरी काय? आता अंजली दमानिया मैदानात, मागितला हिशोब!