AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bird Flu | बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या; डॉ. अजित रानडे यांचं आवाहन

परभणीत बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर 'टीव्ही9 मराठी'शी संवाद साधताना डॉ. अजित रानडे यांनी हे आवाहन केलं. (bird flu Virus can transmit to Humans says dr. ajit ranade)

Bird Flu | बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या; डॉ. अजित रानडे यांचं आवाहन
| Updated on: Jan 11, 2021 | 12:04 PM
Share

मुंबई: राज्यात बर्ड फ्ल्यूने त्याचं अस्तित्व दाखवलं आहे. पक्ष्यांमध्ये होणारा हा आजार असला तरी तो माणसांनाही होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या, असं आवाहन पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी केलं आहे. (bird flu Virus can transmit to Humans says dr. ajit ranade)

परभणीत बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना डॉ. अजित रानडे यांनी हे आवाहन केलं. बर्ड फ्ल्यू हा पक्ष्यांमध्ये होणारा आजार आहे. स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा आजार पसरतो. हा विषाणू पक्ष्यांसाठी घातक आहे. माणसांनाही त्याची लागण होऊ शकते. पण माणसांना या रोगाची लागण होणं अत्यंत दुर्मिळ आहे. पण काळजी घेतली पाहिजे, असं रानडे म्हणाले.

जगात 42 लोकांना बर्ड फ्ल्यूची लागण

गेल्या पाच वर्षातील आकडेवारी पाहिली तर जगात आतापर्यंत 40 ते 42 लोकांना बर्ड फ्ल्यूची लागण झालेली आहे. महाराष्ट्रात तर अशी एकही केस आढळलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच पक्ष्यांसोबत राहणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. पोल्ट्रीफार्ममध्ये स्थलांतरित पक्ष्यांचा शिरकाव होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

चिकन-अंडी खा

मुंबईत अजूनही कुठे हा फ्ल्यू आढळलेला नाही. मुंबईत काही भागात मृत अवस्थेत पक्षी आढळून आले. त्यांचे नमूने तपासले जात आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच योग्य ते निदान होईल, असंही ते म्हणाले. चिकन-अंडी खाण्यास हरकत नाही. पण 70 डिग्री तापमानावर ते शिजवून खावे, असं त्यांनी सांगितलं. 2006 साली पहिल्यांदा आपल्या देशात हा रोग आला. पुण्यात या रोगाचे नमूने तपासले जातात. त्यानंतर अंतिम परिक्षणासाठी भोपाळला पाठवतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (bird flu Virus can transmit to Humans says dr. ajit ranade)

संबंधित बातम्या:

Bird Flu | परभणीत 80 हजार कोंबड्या मारणार; 6 जिल्ह्यात धोका: मंत्री सुनील केदार

Bird Flu | परभणीत बर्ड फ्ल्यूचा धसका; संध्याकाळपर्यंत 10 हजार कोंबड्या नष्ट करणार

परभणीतल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, महाराष्ट्र अलर्टवर

Bird Flu | राज्यात बर्ड फ्ल्यूचं संकट; चिकन-अंडी खाणाऱ्यांसाठी पशुसंवर्धन मंत्र्यांचा मोलाचा सल्ला

(bird flu Virus can transmit to Humans says dr. ajit ranade)

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?