AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने बाजी मारली, या तीन तालुक्यात मतदारांनी कमळ चिन्हालाच दिली पहिली पसंदी

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीनही तालुक्यात भाजपने वर्चस्व स्थापन केले आहे. चंदगड तालुक्यात 40 पैकी 29 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने बाजी मारली, या तीन तालुक्यात मतदारांनी कमळ चिन्हालाच दिली पहिली पसंदी
| Updated on: Dec 20, 2022 | 6:21 PM
Share

कोल्हापूरः महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर या निवडणुकींची कमालीची उत्सुकता लागली होती. सहा महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याचे पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीवर पडणार असल्याचे सांगितले जात होते. सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनीही ग्रामपंचायत निवडणुकीवर आम्हीच बाजी मारणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आज लागलेल्या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातही भाजपचेच कमळ फुलले असल्याचे दिसून येत आहे.

चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असला तरी आता झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र भाजपने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी मागील निवडणुकीत आमदार राजेश पाटील आणि भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांच्यामध्ये जोरदार लढत झाली होती. तर आता झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकी मात्र शिवाजीराव पाटील गटाने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीनही तालुक्यात भाजपने वर्चस्व स्थापन केले आहे. चंदगड तालुक्यात 40 पैकी 29 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. तर आजरा तालुक्यात 13 पैकी 8 आणि गडहिंग्लज तालुक्यात 27 पैकी 14 ग्रामपंचायतीवर भाजपाच्या सरपंचांची निवड झाली आहे.

तिन्ही तालुक्यात भाजप नेते शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळाले असल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर भाजपने वर्चस्व मिळवले असल्याने भविष्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी ही जमेची बाजू ठरणार की भविष्यात आणखी काही गणितं बदलणार याकडे मात्र आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपने या तिन्हीही तालुक्यात वर्चस्व गाजवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र धक्का बसला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.