AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA | ‘मातोश्रीची खरी मम्मी उद्या येतेय’, भाजपा नेत्याने वापरले टोचणारे शब्द

INDIA | इंडिया आघाडीची उद्या आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदाराने बोचरी टीका केली आहे. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. संजय राऊत भाजपामध्ये यायला तयार होते, असा सुद्धा दावा केला.

INDIA | 'मातोश्रीची खरी मम्मी उद्या येतेय', भाजपा नेत्याने वापरले टोचणारे शब्द
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 30, 2023 | 12:15 PM
Share

मुंबई : “इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी, राहुल गांधीं हे नेते मुंबईत येत आहेत, त्यांच्या राज्यात लव जिहादच्या केसेस होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे, याचा जाब उद्धव ठाकरे विचारणार का ?” असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. “बाळासाहेबांनी बांग्लादेशींविरोधात पाऊल उचलले. माझा बाप चोरला अशी भूमिका मांडणारे उद्धव ठाकरे बाळासाहेबांची भूमिका निभावणार का?” असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे. “कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यापासून, हिंदूंवर अन्याय वाढले आहेत. सगळे नेते त्यांना जाब विचारतील का ?” असं नितेश राणे म्हणाले.

“संजय राऊत यांनी नीती आयोगाबाबत टीका केली. मुंबई महाराष्ट्र राज्यापासून तोडणार असा जुना टेपरेकॉर्डर सुरू आहे. मोदी व शाह नसते, तर ठाकरे कुटुंबीयांनी मुंबई विकली असती. मुंबईला पाटणकर व सरदेसाई यांच्याकडून धोका आहे” असं नितेश राणे म्हणाले. “या बैठकींचा काही परिणाम होणार नाही. मुंबईला कोण गिळत होतं, तर ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “मुंबई मोदी-शाह-फडणवीस यांनी वाचवली. लाचार कोण? पळपुटा, खोटारडा कोण? हे सर्वांना माहीत आहे” असं नितेश राणे म्हणाले.

‘मातोश्रीची खरी मम्मी उद्या येतेय’

मातोश्रीची खरी मम्मी उद्या येतेय असं नितेश राणे म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे नेते मुंबईत येत आहेत. “संजय राऊत याने अनेक भाकीतं केली. त्यातील एकही भाकीत खर झालं नाही. अटक होण्याच्या भीतीने हे बोलत आहेत. संजय राऊत जेलमध्ये बसणार” असं नितेश राणे म्हणाले. कालीचरण महाराज यांचे विचार योग्य आहेत. माझा त्यांना पाठिंबा आहे असं नितेश राणे यांनी सांगितलं. ‘राजाराम राऊतची दोन्ही मुलं खोटारडी’

“सुनील राऊत याला पक्षात घ्यायला कोणी 100 कोटी नाही, तर 100 रुपये पण देणार नाही” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. “राजाराम राऊतची दोन्ही मुलं खोटारडी आहेत. संजय राऊत जेलमध्ये असताना हा सुनील राऊत अमित शाहंच्या कार्यालयाबाहेर व भाजप कार्यालयाबाहेर चार चार तास थांबून होता. आम्ही भाजपात प्रवेश करतो पण माझ्या भावाला सोडा अस सांगत होता” असा दावा नितेश राणे यांनी केला.

Follow Us
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर...
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीला विजयाचा प्लॅन दिला, त्या बैठकीची...
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीला विजयाचा प्लॅन दिला, त्या बैठकीची राजकारणात चर्चा!
मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद; उपमहापौरांची अद्यापही फोटो न..
मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद; उपमहापौरांची अद्यापही फोटो न हटवण्याची भूमिका
मुलीची फी भरण्यासाठी चक्क मॅरेथॉनमध्ये धावली आई, पहिला क्रमांक पटकावला
मुलीची फी भरण्यासाठी चक्क मॅरेथॉनमध्ये धावली आई, पहिला क्रमांक पटकावला अन्... काळजाला भिडणारा Video समोर
डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले..
CM Devendra Fadnavis | डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, थेट म्हणाले...
मराठी मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे काय हेतू आहे?- दमानिया
मराठी सक्तीची मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे नेमका हेतु काय? अंजली दमानियांच्या वक्तव्याची तुफन चर्चा
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
Amit Thackeray | 'माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल' अमित ठाकरेंचं विधान चर्चेत
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा...
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक... आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?