लातूर: विधानसभा निवडणुकीवेळी लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत फिक्सिंग झाली होती, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji patil Nilangekar ) यांनी केला. मुंबईतील एका जागेच्या बदल्यात लातुर ग्रामीणची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. मात्र, या मतदारसंघात काँग्रेसला निवडून येण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिवसेनेनं इथं जनसंपर्क नसलेल्या नेत्याला उमेदवारी दिली आणि प्रचारही केला नाही, असे संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले. (BJP leader Sambhaji patil Nilangekar slams Shivsena and Congress)