AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावरकरांच्या जन्मस्थळी भाजप, मनसे आणि शिंदे गटाकडून आंदोलन, गावानं काय केलं ?

राहुल गांधी यांची बुलढाणा मध्ये भारत जोडो यात्रा पोहचली असून शेगावमध्ये त्यांची सभा होणार असून सावरकरांच्या मुद्द्यावर ठाम असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितलं होतं.

सावरकरांच्या जन्मस्थळी भाजप, मनसे आणि शिंदे गटाकडून आंदोलन, गावानं काय केलं ?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 18, 2022 | 3:53 PM
Share

नाशिक : भारतीय जनता पार्टी, मनसे आणि बाळसाहेबांची शिवसेना यांनी एकत्रित येत राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदविला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध नोंदणविण्यासाठी तिन्हीही पक्षाचे नेते भगूर येथील स्मारकाजवळ जमले होते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे विधान केले त्याला विरोध म्हणून भगूर येथील ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील भगूर हे सावरकर यांचे जन्मगाव आहे. राहुल गांधी यांची संपूर्ण देशात भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्याच दरम्यान पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल पुन्हा एकदा दावा केला आहे. यामध्ये राहुल गांधी म्हणाले होते, एकीकडे देशासाठी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली” अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

याशिवाय यापुढेही जाऊन राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बद्दल असलेले पुरावे देखील सादर केले होते. त्यात त्यांनी म्हंटलं होतं की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत.

सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले.

आणि आपण किती शूरवीर होतो हे सांगत होते. त्यांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांची बुलढाणा मध्ये भारत जोडो यात्रा पोहचली असून शेगावमध्ये त्यांची सभा होणार असून सावरकरांच्या मुद्द्यावर ठाम असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितलं होतं.

राहुल गांधी यांच्या विधानावरुन राज्यभर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. ठिकठिकाणी सावरकर यांच्या बद्दल यांच्या विधानावरून आंदोलन होत आहे.

सावरकर यांनी केलेला त्याग आणि देशासाठी दिलेले बलिदान हे सर्वांना ठाऊक आहे पण खासदार राहुल गांधी यांना माहिती नाही म्हणून ते काहीही बरळतात असं आंदोलनादरम्यान खासदार हेमंत गोडसे यांनी म्हंटलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.