AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ता स्थापनेसाठी ‘या’ लोकांची गरजच पडणार नाही; रावसाहेब दानवेंनी निकाला आधीच बॉम्ब फोडला

सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे, त्यातच आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सत्ता स्थापनेसाठी 'या' लोकांची गरजच पडणार नाही; रावसाहेब दानवेंनी निकाला आधीच बॉम्ब फोडला
| Updated on: Nov 22, 2024 | 4:19 PM
Share

सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे, राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालं आहे. एक्झिट पोलनुसार राज्यात कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये, त्यामुळेच निवडणूक निकालापूर्वीच सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या आमदारांचा आकडा कसा जुळवता येईल? याबाबतच्या हालचाली महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटातून सुरू झाल्या आहेत. अपक्ष उमेदवारांना संर्पक साधण्यात येत आहे. मात्र याबाबत बोलताना आम्हाला राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल, त्यामुळे आम्हाला अपक्ष आमदारांची गरज लागणार नाही, असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले दानवे? 

लोकसभेत काँग्रेसनं एक नरेटीव सेट केला त्यामुळे आम्हाला भोगावं लागलं. मात्र यावेळी ते यशस्वी झाले नाहीत. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार बहुमतानं येणार.  आम्ही सरकार स्थापन करणार. बहुमत मिळत असेल तर अपक्ष आमदारांना संपर्क साधण्याची गरज काय? आम्ही बहुमतात येत असल्यानं बंडखोरांशी चर्चा करण्याची गरज नाही.  बंडखोर हा विषय सत्ता स्थापन झाल्यानंतरचा आहे. बंडखोर अपक्ष असेल आणि त्याला जर महायुतीला पाठिंबा द्यायचा असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. वाढलेल्या मतदानाचा टक्का महिलांचा आहे. लाडकी बहिण आमच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पार्टीला कुठेही नुकसान नाही. लोकसभेला जी परिस्थिती होती ती आता सुधारली आहे.  एकनाथ शिंदे हे पूर्णपणे भाजप आणि मित्र पक्षांच्या सोबत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते काहीही बोलले तरी त्याला काही अर्थ नाही. जो मुख्यमंत्री यांचा निर्णय तोच कार्यकर्त्यांचा निर्णय असेल, महायुती पूर्णपणे बहुमतात येऊन सरकार स्थापन करेल जर अपक्ष आमदाराला पाठिंबा द्यायचा असेल तर ते देऊ शकतात, असंही यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.