AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाचं पुढचं टार्गेट आता मुंबई महापालिका, शिर्डीमध्ये अमित शाहांनी पत्ते ओपन केले, कार्यकर्त्यांना काय सांगितलं?

भाजपाच्या अधिवेशनाचा समारोप रविवारी शिर्डीत झाला. या समारोप समारंभास भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

भाजपाचं पुढचं टार्गेट आता मुंबई महापालिका, शिर्डीमध्ये अमित शाहांनी पत्ते ओपन केले, कार्यकर्त्यांना काय सांगितलं?
| Updated on: Jan 12, 2025 | 6:44 PM
Share

भाजपाच्या अधिवेशनाचा समारोप रविवारी शिर्डीत झाला. या समारोप समारंभास भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीबाबत देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले अमित शाह? 

इतका आवाज कमी का? मुंबईपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत याहून मोठा विजय आपण मिळवणार आहोत, असं म्हणत त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबाबतचा आपला इरादा स्पष्ट केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला माहिती नाही की तुम्ही किती मोठं काम केलंय, शरद पवारांच्या दगा फटक्याच्या राजकरणाला मातीत घालण्याचं काम महाराष्ट्रानं केलं आहे.  हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने जागा दाखवली आहे, पवारांना सांगू शकतो की सर्व विभागात आमच्या जागा जिंकल्या आहेत, असा घणाघात यावेळी अमित शाह यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे, ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. तर अजित पवार यांचीच राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी आहे. घरणेशाहीला थोबाडीत मारत तुम्ही सिद्धांताचे राजकारण चालतं हे दाखवून दिलं, मी शरद पवारांना सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रात 19, कोकणात 16, पश्चिम महाराष्ट्रात 24 जागा आम्ही जिंकल्या आहेत. धोका देण्याची सुरुवात शरद पवारांनी तर शेवट उद्धव ठाकरेंनी केला. या मंडळींना घरी बसवण्याचे काम तुम्ही केलं. असंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांचं कौतुक

पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न पाहिले, कामही सुरू केलं. आता दुसऱ्या टर्ममध्ये मोदीजी आणि फडणवीस प्रत्येक शेतावर पाणी पोहोचवतायेत पुढील निवडणुकीत मतं मागायला येण्यापूर्वी शेतात पाणी पोहोचवणार यापूर्वीचे लोक आत्महत्या रोखू शकले नाहीत,  ३१ मार्च २०२६ पूर्वी देशातून नक्षलवाद संपवणार, असं अश्वासनही यावेळी अमित शाह यांनी यावेळी दिलं.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.