AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prediction of Rain – पहाटे जाहीर होणार बुलडाण्याच्या भेंडवळची भविष्यवाणी, वर्षाचे पावसाचे भाकीत जाहीर होणार

पावसाची आणि शेतातील पिकांबद्दल जी भविष्यवाणी केली जाते त्याला अनन्यसाधारण महत्व आहे

Prediction of Rain - पहाटे जाहीर होणार बुलडाण्याच्या भेंडवळची भविष्यवाणी, वर्षाचे पावसाचे भाकीत जाहीर होणार
Image Credit source: TV9
| Updated on: May 03, 2022 | 7:53 PM
Share

बुलडाणा – येत्या वर्षात पाऊस-पाणी कसे असेल, पिकांची स्थिती काय असेल, राज्यावर-देशावर काय संकटं येणार, या सगळ्याची उत्सुकता शमवणारी आणि भविष्याचा अंदाज व्यक्त करणारी बुलडाण्याची प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी बुधवारी पहाटे जाहीर होणार आहे. (Indian Meteorological Department) भारतीय हवामान विभागाने यंदाही सरासरीच्या तुलनेत अधिकच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा शास्त्रशुध्द पध्दतीने वर्तवलेला अंदाज असला तरी भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने (Rain forecast) पावसाची आणि शेतातील पिकांबद्दल जी भविष्यवाणी केली जाते त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. अशीच भविष्यवाणी (Buldana) जिल्ह्यातील भेंडवळ येथे घटमांडणी रुपाने केली जाते. गेल्या 300 वर्षापासून ही भविष्यवाणी केली जाते. एवढेच नाही तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारे ही घटमांडणी असते. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली गेली. या घटमांडणीचे भाकीत बुधवारी पहाटे वर्तवण्यात येणार आहे. या घट मांडणीच्या भाकीताकडे राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकिय नेत्यांचेही लक्ष असते.अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मंगळवारी संध्याकाळी पुंजाजी महाराज यांच्या हस्ते शेतातील जमिनीत खड्डा खोदून घटमांडणी करण्यात आली . पहाटे पुंजाजी महाराज वाघ हे शेती ,राजकारण,आरोग्य,आर्थिक घडामोडी आदी विषया संदर्भात भाकीत व्यक्त करणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी भेंडवळ मध्ये दाखल झाले आहेत.

भेंडवळची घट मांडणी म्हणजे काय?

भेंडवळच्या घट मांडणीत शेती, पाऊसमान, आरोग्य,पृथ्वीवरील संकटे, राजकारणाविषयी वर्षभराचा अंदाज वर्तवला जात असतो.त्यामुळे साहजिकच राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे डोळे भेंडवळच्या वार्षिक भाकिताकडे लागलेले असते. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर परिसरातील शेतकऱ्यांनच्या उपस्थितीत सायंकाळी 6 वाजता या घटमांडणीला प्रारंभ झाला होता. 4 मे रोजी सकाळी या घटमांडणीची भाकीत जाहीर केली जाणार आहे. पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भेंडवळ या चार हजार लोकसंख्येच्या या गावात अक्षय तृतीयेला घट मांडण्याची परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षापासून सुरू आहे अस ग्रामस्थ सांगतात. घटमांडणीची परंपरा सुरू करणारे चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज भाकीत जाहीर करतात.

अशी केली जाते घट मांडणी.

अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर आणि करडी अशा 18 प्रकारची धान्ये ठेवण्यात येतात तर मध्यभागी 4 मातीचे ढेकळे ठेऊन त्यावर पाण्याने भरलेली घागर असते.घागरीवर पान-सुपारी, पुरी, पापड, चांडोली खुर्द, भजे, वडे हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर या ठिकाणी कोणीही जात नाही, दुसऱ्या दिवशी पहाटे घटामध्ये झालेल्या बदलावरून आणि घटाच्या आतील धान्याचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविले जाते. त्यावरून पिकाचा आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. कोणत्या महिन्यात पाऊस जास्त कोणत्या महिन्यात पाऊस कमी सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी यंदा कोणती पिके घ्यायची हे ठरवत असतात. चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली परंपरा पुंजाजी महाराज यांनी आजही कायम ठेवली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीही गावातील हनुमान मंदिराच्या पारावर मांडणी केली जाते. या दोन्ही मांडणीमध्ये साम्य असते त्यामुळे या दोन्ही मांडणीचे निष्कर्ष एकत्र जोडून वर्तवली जातात.

फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत.
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.