AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिकडे कर्मचारी संपावर, इकडे शेतकरी संघटना आक्रमक; स्मशानभूमीत केले हे आंदोलन

कापूस, सोयाबीन, कांदा याच्या भावावर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे. तसेच नुकसानभरपाईची मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली पाहिजे. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले पाहिजे.

तिकडे कर्मचारी संपावर, इकडे शेतकरी संघटना आक्रमक; स्मशानभूमीत केले हे आंदोलन
| Edited By: | Updated on: Mar 14, 2023 | 4:07 PM
Share

बुलढाणा : गेल्या दहा ते बारा दिवसापासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावर शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी हिताचे कुठलेही निर्णय घेण्यात आले नाही. तसेच दररोज कुठल्या ना कुठल्या विभागात संप सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे काम ठप्प पडलेले आहेत. शेतकऱ्यांचा जगून काहीही फायदा नाही. असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात अनेक शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. आज संग्रामपूर तालुक्यातील निरोड बाजार येथील स्मशानभूमीमध्ये गळफास घ्या, असे आंदोलन पुकारलेलं आहे. येत्या 12 तासात सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, तर आम्ही स्मशानभूमीतच गळफास घेत जीवन संपवत असल्याची भूमिका प्रशांत डिक्कर यांनी घेतली. यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

buldana new 2

लोकप्रतिनिधींना लाज वाचली पाहिजे

प्रशांत डिक्कर म्हणाले, गेल्या बारा दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही. शेतकरी राज्यात आत्महत्या करत आहे. सरकार नको त्या घोषणा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करत आहे. या लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे.

पिकविम्याचे पैसे खात्यात जमा करा

स्मशानभूमित आम्ही ४० ते ५० शेतकरी आलो आहोत. आम्ही येथील स्मशानभूमीत गळफास आंदोलन सुरू केले आहे. कापूस, सोयाबीन, कांदा याच्या भावावर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे. तसेच नुकसानभरपाईची मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली पाहिजे. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले पाहिजे.

शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करा

शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करावे. दिल्ली, मुंबईतील मजुरांप्रमाणे सुविधा ग्रामीण भागातील शेतमजुरांना मिळाल्या पाहिजे. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या संदर्भात चर्चा झाली नाही. तर आम्ही गळफास घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला.

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील १८ लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामध्ये कारागृहातील कर्मचारी देखील संपामध्ये सहभागी झाले आहेत. बुलढाणा जिल्हा कारागृहाचे कामकाज देखील ठप्प झाल्याची माहिती संपात सहभगी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी आजपासून कर्मचाऱ्यानी बेमुदत संप पुकारला. पोलीस अधीक्षक कार्यालयात मंत्रालयीन कामकाज करणारे कर्मचारी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही करणाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिसर दणाणून सोडला होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.