AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी कैलास नागरे यांच्या रक्षा विर्सजनाच्या दिवशीच बहिणीने सरकारला सुनावलं, म्हणाल्या…

बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली, आज त्यांच्या रक्षा विर्सजनाचा कार्यक्रम होता.

शेतकरी कैलास नागरे यांच्या रक्षा विर्सजनाच्या दिवशीच बहिणीने सरकारला सुनावलं, म्हणाल्या...
| Updated on: Mar 16, 2025 | 9:00 PM
Share

बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली, त्यानंतर पुन्हा एकदा शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान कैलास नागरे यांची बहीण सत्यभामा नागरे यांनी कैलास नागरे यांच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमातच सरकारला खडे बोल सुनावले आहेत. यावेळी तिथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव व स्थानिक आमदार मनोज कायंदे यांची देखील उपस्थिती होती. माझ्या भावाच्या नावासमोर आत्महत्या नाही तर बलिदान हा शब्द लावण्यात यावा,  कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतो. आणि तेही पाण्यासाठी? असा सवाल यावेळी सत्यभामा नागरे यांनी उपस्थित केला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावं अशी त्यांची मागणी होती. मात्र त्यांची मागणी पूर्ण न झाल्यानं त्यांनी आत्महत्या केली. आज त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी राज्यभरातील शेकडो शेतकरी शिवनी येथे आले होते. रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव व स्थानिक आमदार मनोज कायंदे हे देखील उपस्थित होते.

यावेळी कैलास नागरे यांच्या भगिनी असलेल्या सत्यभामा नागरे यांनी राजकारण्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. ” माझ्या भावासमोर आत्महत्या हा शब्द वापरू नका,  तर बलिदान हा शब्द वापरावा,  माझ्या भावाला हे माहीत होतं की या देशात बलिदान दिल्याशिवाय काहीही होत नाही , आणि म्हणून त्याने शेतकऱ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे. हे राजकारणी लोक आपल्या देशाला कृषी प्रधान म्हणतात. पण देशाला कृषीप्रधान म्हणताना त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, असे खडेबोल यावेळी सत्यभामा नागरे यांनी सुनावले आहेत. कैलास नागरे यांनी शेतकऱ्यांना पाणी मिळावं अशी मागणी केली होती, मात्र पाणी न मिळाल्यानं त्यांनी आत्महत्या केली आहे,  त्यानंतर आता राज्यात वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.