AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचव्या टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी मुंबई ते नाशिकपर्यंत हंगामा

मतदानाच्या दिवशी मुंबईत ते नाशिकपर्यंत राजकीय हंगामा पाहायला मिळाला. मुंबईतच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं आमदार सुनिल राऊत भडकले. तर नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पाचव्या टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी मुंबई ते नाशिकपर्यंत हंगामा
shailesh musale
shailesh musale | Updated on: May 21, 2024 | 1:09 AM
Share

पाचव्या टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी मुंबई ते नाशिकपर्यंत हंगामा झाला. संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनिल राऊत आणि पोलिसांमध्ये भांडुपच्या पोलिंग बुथच्या बाहेर चांगलीच बाचाबाची झाली. पोलिसांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं सुनिल राऊत मतदान केंद्राबाहेर आले.

मतदान केंद्राच्या बाहेर काही अंतरावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते डमी EVM मशीनद्वारे प्रात्यक्षिकं दाखवत होते..त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र लोकांमध्ये जनजागृती करणं चूक आहे का ? असा सवाल करत सुनिल राऊत पोलिसांवर भडकले.

ठाकरे गटाचे ते कार्यकर्ते 100 मीटरच्या बाहेर, डमी मशिनद्वारे जनजागृती करत होते..त्यामुळं काही वेळात या दोघांनाही सोडून देण्यात आलं. इकडे नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मतदान केंद्रावर शांतिगिरी महाराजांच्या नावानं चिठ्ठ्या वाटत असल्याच्या आरोपात, म्हसरुळ पोलिसांनी जनेश्वर महाराजांना ताब्यात घेतलं. तर शांतीगिरी महाराजांच्या समर्थकांनी जय बाबाजी नावाचे स्टिकरही लावले होते. ज्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला.

तर शांतिगिरी महाराज आपल्या कृतीनंही अडचणीत आलेत. मतदानावेळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मतदान कक्षावरच हार घालता. त्यानंतर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकमध्येच, माऊली लॉन्स परिसरात मतदान केंद्रावर जेवण घेवून जाणाऱ्या शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे आणि भाजपच्या आमदार सीमा हिरेही त्या मतदान केंद्रावर आल्या आणि त्या अधिकाऱ्याला जाब विचारला.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपवर थेट आरोप केला. मुंबईत दिवसभर संथ गतीनं मतदान होत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यावरुन पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी, ज्या ठिकाणी शिवसेनेला मतदान होतंय, त्याच ठिकाणी विलंब होत असल्याचा आरोप केला.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.