AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषदेची 12 नावं स्वीकारली नाहीत, पद्म पुरस्कारांबद्दल आश्चर्य कसं वाटेल: छगन भुजबळ

महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर पद्म पुरस्कारांची घोषणा आणि कृषी कायद्यांवरुन निशाणा साधला आहे. (Chhagan Bhujbal Farmer Protest)

विधानपरिषदेची 12 नावं स्वीकारली नाहीत, पद्म पुरस्कारांबद्दल आश्चर्य कसं वाटेल: छगन भुजबळ
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 26, 2021 | 9:18 PM
Share

नाशिक: महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर पद्म पुरस्कारांची घोषणा आणि कृषी कायद्यांवरुन निशाणा साधला आहे. विधान परिषदेच्या आमदाराकीसाठी दिलेल्या नावांना राज्यपालांकडून संमती मिळत नाही. तिथे केंद्र सरकारनं महाराष्ट्रानं पाठवलेल्या नावांपैकी एकच नाव स्वीकारलं यात काही आश्चर्य वाटत नाही, असं भुजबळ म्हणाले. दिल्लीला सुद्धा राज्यानं पाठवलेली नावं दिसली नसतील, असंही ते म्हणाले. (Chhagan Bhujbal criticised BJP and Central Government over Padma Awards and Farmer Protest)

कृषी आंदोलनावरुन केंद्रावर टीका

छगन भुजबळ यांनी आज दिल्लीत झालेल्या प्रकारावरुन केंद्रावर टीका केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांना चर्चेला बोलावताय का टिंगल लावलीय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेऊ शकतात अशा लोकांनी त्यांच्या सोबत बसलं पाहिजे, केंद्र सरकार आडमुठी भूमिका घेतेय, असा आरोप भुजबळ यांनी केला. राज्यातील शेतकरी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरले होते. शेतकरी मुंबईच्या रस्त्यावर उतरले असताना राज्यपाल निवेदन घेण्यासाठी देखील उपस्थित नव्हते. राज्यपालांना कार्यक्रम असतात, पण प्रायोरीटीनुसार कार्यक्रम बदलायला हवे होते, अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली.

कृषी कायद्यांवरुन सरकार हटवादी पणा करते की सरकारचे प्रमुख हटवादी आहेत हे कळत नाही. असंही भुजबळ म्हणाले. दिल्लीत झालेल्या हिसेंचे समर्थन करता येणार नाही. मॉब सायकलॉजी असते, हे प्रकरण चिघळणार नाही यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे होते, भुजबळ म्हणाले.

दिल्लीतल्या घटनेवर शरद पवार काय म्हणाले?

कृषी कायद्यांची चर्चा 2013 पासून सुरु आहे. सगळ्या राज्यांच्या कृषी आणि पणनमंत्र्यांशी चर्चा करुन कायदे करण्याबाबत चर्चा झाली. निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार आलं. नरेंद्र मोदी सरकारनं 3 कायदे संसदेत आणले. विरोधकांचं मत कायद्यांवर सविस्तर चर्चा व्हावी. सिलेक्ट कमिटीकडे विधेयकं पाठवावी. तिथं सरकारचं बहुमत असतं. सिलेक्ट कमिटीमध्ये पक्षीय भूमिकेपलीकडे जाऊन निर्णय होतो. सिलेक्ट कमिटीकडून आल्यावर विरोध होत नाही. सरकारनं एका दिवसात विधेयक आणली. गोंधळात विधेयक मंजूर केली गेली. त्यामुळे विरोध सुरु झाला. यामुळे शेतकरी विरोध करतील असं वाटत होते. गेल्या 50 ते 60 दिवस पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी संयमानं आंदोलन केले. दिल्लीच्या सीमांवर 5 किलोमीटर वर शेतकरी संयमानं बसतात, ही अभूतपूर्व गोष्ट आहे. शेतकरी संयमानं बसले होते त्यावेळी सरकारनं अधिक सक्रिय होऊन मार्ग काढला पाहिजे होता, असं शरद पवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

Delhi Farmers Tractor Rally | केंद्राने अजूनही शहाणपणा दाखवावा, टोकाची भूमिका घेऊ नये : शरद पवार

Delhi Farmers Tractor Rally: हिंसा हा पर्याय नाही; शेतकरी आंदोलनावर राहुल गांधींसह कोण काय म्हणालं?

(Chhagan Bhujbal criticised BJP and Central Government over Padma Awards and Farmer Protest)

Follow Us
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Rohit Sharma : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा सत्तापालट ? रोहित शर्मा-नीता अंबानींच्या भेटीने चर्चांना उधाण.

Rohit Sharma : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा सत्तापालट ? रोहित शर्मा-नीता अंबानींच्या भेटीने चर्चांना उधाण

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला