AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का? योगींवर भुजबळ कडाडले

आरोपींच्या बाजूने भाजपचे लोक एकत्र आले आहेत. मुलींना संस्कारित करा, असे भाजपचे आमदार म्हणतात.

मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का? योगींवर भुजबळ कडाडले
| Updated on: Oct 06, 2020 | 5:24 PM
Share

मुंबई: हाथरस बलात्कार प्रकरणावरून राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. हाथरस प्रकरणानंतर मोदी सरकार शांत बसले आहे. एकीकडे कंगना रानौतला वाय प्लस सुरक्षा दिली जाते. दुसरीकडे ज्या मुलीवर अत्याचार झाले तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा तर सोडाच उलट त्यांची नार्को टेस्ट करण्याचा विचार सुरु आहे. हे नक्की कोणत्या डोक्याने चालतात, हे मला समजत नसल्याचे छगन भुजबळांनी म्हटले.  (Chhagan Bhujbal slams Yogi Adityanath )

ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हाथरस बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना फासावर लटकवले पाहिजे. उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी सरकारने हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज होती. मात्र, आता पीडितेच्या कुटुंबीयांची नार्को टेस्ट करण्याचा विचार सुरु आहे. पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिलांना कोंडून ठेवले, असे भुजबळांनी सांगितले.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेले तेव्हा त्यांनाही रोखण्यात आले. आरोपींच्या बाजूने भाजपचे लोक एकत्र आले आहेत. मुलींना संस्कारित करा, असे भाजपचे आमदार म्हणतात. मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का?, असा संतप्त सवाल त्यांनी भाजपला विचारला.

तसेच वाल्मिकी समाजाची मुलगी असू दे किंवा ठाकूर अथवा ब्राह्मण असू दे. ती आपल्या मुलीसारखी आहे. मागासवर्गीय समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी बहुसंख्य समाजावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘सुशांत सिंह प्रकरणाचा वापर राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी झाला’

अभिनेता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणावरुन मुंबई पोलीस आणि शिवसेनाप्रणित सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मुंबई पोलिसांनी दोन दिवसांत सुशांतने आत्महत्या केल्याचे सांगितले होते. मात्र, ही हत्या आहे की आत्महत्या हे समजण्यासाठी सीबीआयला दोन महिने लागले. सुशांत सिंह गेल्याचे कुणालाही दु:ख नव्हते. पण अनेकांना त्यावर राजकारण करायचे होते, अशी टीकाही यावेळी छगन भुजबळ यांनी केली.

संबंधित बातम्या:

…तर दंगली भडकल्या असत्या, हाथरस प्रकरणी यूपी सरकारचा सुप्रीम कोर्टात दावा

Sanjay Raut | नटीसाठी छाती बडवणाऱ्यांना हाथरसचं तिकीट काढून द्या, राऊतांचा टोला

योगी आदित्यनाथांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, हाथरस पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष- बाळासाहेब थोरात

(Chhagan Bhujbal slams Yogi Adityanath )

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.