AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने…विधिमंडळातील सत्कारानंतर सरन्यायाधीश काय म्हणाले?

भारताचे सरन्यायाधीस भूषण गवई यांचा महाराष्ट्राच्या विधिमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते.

बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने...विधिमंडळातील सत्कारानंतर सरन्यायाधीश काय म्हणाले?
bhushan gavai
| Updated on: Jul 08, 2025 | 3:50 PM
Share

भारताचे सरन्यायाधीस भूषण गवई यांचा महाराष्ट्राच्या विधिमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते. दोन्ही सभागृहांतील सदस्यांच्या उपस्थितीत गवई यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी माझ्यासाठी हा सत्कार फार महत्त्वाचा आहे. कारण याच विधिमंडळात माझ्या वडिलांनी अनेक वर्षे लोकप्रतिनिधत्त्व केलेलं आहे. त्याच सभागृहात माझा सत्कार होत आहे. ही माझ्यासाठी फार भूषणवाह बाब आहे, असे गवई म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भारतीय संविधानाबाबत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे भारतीय संविधानविषयक विचार यावर मत व्यक्त केले. संविधान तयार करताना आंबेडकरांचे विचार काय होते? याबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

बाबासाहेबांना ऐनवेळी बोलायला सांगितलं, नंतर…

मी भारतीय राज्यघटनेचा विद्यार्थी आहे. या विधिमंडळाशी माझ्या वडिलांचं ३० वर्षापेक्षा अधिक प्रेमाचं नातं राहिलं आहे. त्या विधिमंडळात माझा सन्मान करत आहात हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ९ डिसेंबर १९४६ रोजी भारताच्या घटना समितीची पहिली बैठक झाली. १३ डिसेंबर १९४६ रोजी नेहरूंनी घटना समितीचं स्वरुप आणि स्कोप काय राहिल असं सांगितलं. १३ डिसेंबर रोजी बाबासाहेबांना बोलायला सांगितलं. त्यांना वाटलं होतं दोन ते तीन दिवसाने क्रम येईल असं वाटलं होतं असं बाबासाहेब म्हणाले. पण त्यांना ऐनवेळी बोलण्यास सांगितलं. मसुदा समितीचे अध्यक्ष होऊ असं त्यांना वाटलं नाही, असे गवई म्हणाले.

मूलभूत अधिकाराचं हनन झालं असेल तर…

तसेच, या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशनमध्ये अनेक गोष्टी आहेत. यात राईट टू लाइफ, राईट टू लिबर्टी आहे, राईट टू होल्डिंग अ प्रॉपर्टी या मूलभूत गोष्टीत त्यात नाही. आपण त्यात काही फंडामेटल अधिकार दिले. पण राईट्स नाही दिले. जोपर्यंत मूलभूत अधिकाराचं हनन झालं असेल तर त्यावर रेमिडी देणार नसू तर अधिकाराला काही अधिकार नाही, असं बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याचं गवई म्हणाले.

बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने…

तसेच, मला नेहरूंकडून अधिक अपेक्षा होत्या असं आंबेडकर म्हणाले होते. या घटनेत देशात सामाजिक आर्थिक एकता कशी यावी यासाठीची त्यात तरतूद नाही, असं बाबासाहेबांनी सांगितलं. बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते. मी प्रथम आणि शेवटचा भारतीय आहे, असं बाबासाहेब म्हणाले होते, अशी आठवण गवई यांनी सांगितली.

बाबासाहेबांनी त्यावेळी आपल्या भाषणात अनेक इशारा दिले आहेत. बाबासाहेब म्हणाले की मोठ्या मुश्किलीने हे स्वातंत्र्य मिळालं आहे. हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर जातीभेद दूर करून त्यावर कारवाई करण्याची राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय या घटनेद्वारे देण्याचं वचन दिलं आहे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही काय आहे? तर सामाजिक आणि राजकीय लोकशाही हे स्वातंत्र्य, समता आणि बंधूत्व आहे. हा जगण्याचा मार्ग आहे. आपण ती मिळवली पाहिजे असं बाबासाहेब म्हणल्याचेही सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले.

बंधुत्व यासाठी महत्त्वाचं आहे की….

नुसती समानता राहिली तर लोकांना आपल्या आयुष्यात काही हासिल करण्याचं इनिशिएटिव्ह राहणार नाही. केवळ स्वातंत्र्य राहिलं तर दुबळ्यावर त्याचं वर्चस्व राहिली. बंधुत्व यासाठी महत्त्वाचं आहे की इक्विटी आणि लिबर्टिचं संरक्षण असेल, असं बाबासाहेब म्हणाल्याची आठवण गवई यांनी करून दिली.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबांचा गौरव केला होता. बाबासाहेबांचं आरोग्य चांगलं नसतानाही त्यांनी एकहाती हे मिशन पूर्ण केल्याचं राजेंद्र प्रसाद म्हणाले होते, अशी आठवण गवई यांनी सांगितली.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....