AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जलयुक्त शिवार योजनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाला डिवचलं, म्हणाले अडीच वर्षे…

महाविकास आघाडीला टोला लगावत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेवरुन देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

जलयुक्त शिवार योजनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाला डिवचलं, म्हणाले अडीच वर्षे...
Image Credit source: Google
| Updated on: Feb 13, 2023 | 11:50 AM
Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी टीव्ही 9 मराठीच्या ( TV 9 Marathi ) व्यासपीठावरून महासंकल्प ( Mahasankalp ) मांडत असतांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची असणारी जलयुक्त शिवार योजनेबद्दल भाष्य केलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्या सरकारने घेतलेल्या जलयुक्त शिवार ( Jalyukt Shiwar ) योजनेचं कौतुक केलं आहे. यावेळी मात्र महाविकास आघाडी सरकारने ती योजना रद्द केल्याचे सांगत आम्ही ती पुन्हा सुरू केल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. शेती हा शास्वत विकास झाला पाहिजे. पीक पद्धतीत बदल झाला पाहिजे. पारंपरिक शेती बरोबर सेंद्रिय शेतीवर काम केलं पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

केंद्र सरकारने बजेटमध्ये सेंद्रिय शेतीसाठी तरतूद केली आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीला सुद्धा आम्ही मदत करणार आहोत, सेंद्रिय शेतीला लागणाऱ्या पाण्याचा मुद्दा सुद्धा आम्ही निकाली लावणार आहोत.

यामध्ये 18 ते 20 असे प्रकल्प होते ते आम्ही सुरुवातीला तीन-चार महिन्यात हाती घेतले आहे. सिंचन प्रकल्पाला मंजूरी देऊन अडीच ते पाच लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. त्यामुळे शेतीला मोठी मदत होईल.

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली. पावसाचे पडणारे पाणी एक एक थेंब झिरपले पाहिजे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना ही जलयुक्त शिवार योजना सुरू झाली होती, तीचा आदर्श इतर राज्यांनी घेतला.

पण मागील सरकारने ती योजना बंद करून टाकली होती, ती आम्ही पुन्हा सुरू केली आहे. प्रभावीपणे आम्ही ती योजना राबवत आहे. पावसाचे जे पाणी आहे ते दुष्काळी भागात कसे वळविता येईल त्याचे काम आम्ही हात घेतले आहे.

शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे, सामूहिक शेती केली पाहिजे त्यासाठी आम्ही काही योजना आणणार आहोत, त्याचे ब्रँडिग आणि मार्केटिंगसाठी सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी टीव्ही 9 मराठीच्या महाराष्ट्राच्या महासंकल्पमध्ये कृषी विषयावर भाष्य करत शेतकऱ्यांना मदत करणार आहोत आणि यापुढे काय योजना आहेत याचा संकल्प मांडला आहे.

याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतांना महाविकास आघाडीला चांगलाच टोला लगावला आहे.

Follow Us
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....