AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2019 ला व्हायला पाहिजे होतं ते चार महिन्यापूर्वी झालं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले ?

संजय राऊत यांच्या टीकेला अजय बोरस्ते यांनी उत्तर दिले असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पकाळात हे सरकार लोकप्रिय झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे.

2019 ला व्हायला पाहिजे होतं ते चार महिन्यापूर्वी झालं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले ?
Image Credit source: Google
| Updated on: Dec 16, 2022 | 1:01 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये एक मोठं विधान केलं आहे. चार महिन्यापूर्वी आलेले सरकार 2019 मध्ये यायला पाहिजे होतं असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज नाशिकमधील ठाकरे गटाचे अकरा माजी नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर प्रवेश केला आहे. चार महिन्यापूर्वी राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार आले आहे आणि ते सरकार 2019 मध्ये यायला हवे होते असा एकप्रकारे सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. याशिवाय जनतेला आमचा निर्णय योग्य वाटला आहे. दौऱ्याला गेल्यानंतर स्वागतासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. जनतेची कामं व्हायला लागली आहे. त्यामुळे लोकांना हे सरकार आपलं सरकार वाटत आहे. सगळेच जण विश्वास ठेवत असल्यानं दररोज प्रवेश होत आहे. नाशिकमधील 11 जणांनी प्रवेश केला आहे. नाशिकला मोठा इतिहास आहे. त्यामुळे नाशिकचा सर्वांगीन विकास करायचा आहे. त्यासाठी बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजप ह्या युतीच्या माध्यमातून नाशिकच्या जनतेची कामे करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी शिंदे गटात नाशिकच्या नगरसेवकांनी प्रवेश केला त्यावर दलाल असल्याची टीका केली होती, त्यावर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलणं टाळलं आहे.

संजय राऊत यांच्या टीकेला अजय बोरस्ते यांनी उत्तर दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पकाळात हे सरकार लोकप्रिय झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे.

नाशिक शहरातील 11 नगरसेवकांनी बाळसाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या वतिने अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

नाशिक शहरातील झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौरा करत घटनास्थळी पाहणी केली होती, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशावरून चित्र बदलंल असल्याचे म्हंटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या सिडकोबाबत जो निर्णय घेतला त्याची मोठी मदत होणार आहे, नागरिकांच्या नावावर घरे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

याच वेळी ज्यांनी बाळसाहेबांचे विचार सोडले त्यांच्या कडून लोकं अपेक्षा करत नाही, कामं होत असल्याने नागरिक आपल्या पक्षात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

मात्र, याचवेळी बोलतांना चार महिन्यांपूर्वी जे सरकार आलं ते 2019 मध्ये यायला पाहिजे होतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटल्यानं या विधानावरून राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.