AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2019 ला व्हायला पाहिजे होतं ते चार महिन्यापूर्वी झालं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले ?

संजय राऊत यांच्या टीकेला अजय बोरस्ते यांनी उत्तर दिले असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पकाळात हे सरकार लोकप्रिय झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे.

2019 ला व्हायला पाहिजे होतं ते चार महिन्यापूर्वी झालं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले ?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 16, 2022 | 1:01 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये एक मोठं विधान केलं आहे. चार महिन्यापूर्वी आलेले सरकार 2019 मध्ये यायला पाहिजे होतं असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज नाशिकमधील ठाकरे गटाचे अकरा माजी नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर प्रवेश केला आहे. चार महिन्यापूर्वी राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार आले आहे आणि ते सरकार 2019 मध्ये यायला हवे होते असा एकप्रकारे सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. याशिवाय जनतेला आमचा निर्णय योग्य वाटला आहे. दौऱ्याला गेल्यानंतर स्वागतासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. जनतेची कामं व्हायला लागली आहे. त्यामुळे लोकांना हे सरकार आपलं सरकार वाटत आहे. सगळेच जण विश्वास ठेवत असल्यानं दररोज प्रवेश होत आहे. नाशिकमधील 11 जणांनी प्रवेश केला आहे. नाशिकला मोठा इतिहास आहे. त्यामुळे नाशिकचा सर्वांगीन विकास करायचा आहे. त्यासाठी बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजप ह्या युतीच्या माध्यमातून नाशिकच्या जनतेची कामे करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी शिंदे गटात नाशिकच्या नगरसेवकांनी प्रवेश केला त्यावर दलाल असल्याची टीका केली होती, त्यावर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलणं टाळलं आहे.

संजय राऊत यांच्या टीकेला अजय बोरस्ते यांनी उत्तर दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पकाळात हे सरकार लोकप्रिय झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे.

नाशिक शहरातील 11 नगरसेवकांनी बाळसाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या वतिने अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

नाशिक शहरातील झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौरा करत घटनास्थळी पाहणी केली होती, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशावरून चित्र बदलंल असल्याचे म्हंटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या सिडकोबाबत जो निर्णय घेतला त्याची मोठी मदत होणार आहे, नागरिकांच्या नावावर घरे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

याच वेळी ज्यांनी बाळसाहेबांचे विचार सोडले त्यांच्या कडून लोकं अपेक्षा करत नाही, कामं होत असल्याने नागरिक आपल्या पक्षात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

मात्र, याचवेळी बोलतांना चार महिन्यांपूर्वी जे सरकार आलं ते 2019 मध्ये यायला पाहिजे होतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटल्यानं या विधानावरून राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
सडलेलं अन्न, Unsafe Products?; स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका
ऑनलाइन अन्न मागवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी