AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन महिन्यांपूर्वी आम्ही पर्यटन करून आलो, त्यामुळे नाशिकच्या पर्यटनाला चालना देऊ – मुख्यमंत्री

राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आपल्याला करायचे आहे, त्यासाठी दुर्ग प्राधिकरण आपण लवकरच सुरू करणार असल्याचे म्हंटले आहे.

तीन महिन्यांपूर्वी आम्ही पर्यटन करून आलो, त्यामुळे नाशिकच्या पर्यटनाला चालना देऊ - मुख्यमंत्री
Image Credit source: Google
| Updated on: Oct 21, 2022 | 10:46 PM
Share

नाशिक : तीन महिन्यांपूर्वी आम्ही मोठे पर्यटन करून आलो आहेत, त्यामुळे नाशिकच्या पर्यटनाला (Nashik tourism) चालना देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नाशिकमध्ये म्हंटले आहे. नाशिकमध्ये स्थानिक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान केले आहे. मुख्यमंत्री यांनी हे विधान करताच सभागृहात एकच हशा पिकला होता. दरम्यान, कार्यक्रमाला उपस्थित असलेले संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकला राज्यातील सर्वाधिक किल्ले आहेत, त्याचे जतन संवर्धन व्हायला हवे, ती आपली खरी संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात कसे गड किल्ले उभे केले असतील? हे गडकिल्ले जपण्याचे काम आपल्याला करायचं आहे असे संभाजीराजे म्हणाले होते, त्याच मुद्द्याला धरून बोलत असतांना मुख्यमंत्री यांनी तीन महिन्यापूर्वी केलेल्या पर्यटनाची आठवण काढत गड किल्ले संवर्धनाबाबत महत्वाची भूमिका घेतली आहे.

राज्यातील अनेक तरुण हे मला येऊन भेटत असतात, गड किल्ल्यांच्या संदर्भात आम्हाला काम करायचे आहे असे सांगत असतात, लोकांमध्ये मोठा उत्साह असल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे.

याशिवाय राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आपल्याला करायचे आहे, त्यासाठी दुर्ग प्राधिकरण आपण लवकरच सुरू करणार असल्याचे म्हंटले आहे.

रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडचे काम संभाजीराजे यांनी चांगले काम केले आहे, गड किल्ल्यांचे संवर्धन हा महत्वाचा विषय घेऊन ते काम करत आहे असल्याचे देखील म्हंटले आहे.

मुंबई आणि पुणे या शहराला लागून असलेले हे मोठे आणि ऐतिहासिक शहर असल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे. त्यात कुंभमेळा होत असल्याने त्याची तयारी देखील आपण करत असल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कामे संत गतीने होत होती, मात्र आता ती आपल्याला गती देऊन करायची आहे, त्यात नाशिकचा विकास आपल्याला करायचा असून त्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.