AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधकांना टोला, पंचामृत थोडे थोडेच दयायचे असते. लोटा भरून दिले तर…

नवे राज्यपाल रमेश बैस यांनी जबाबदारी घेतल्यानंतर युती सरकारचे हे पहिले अधिवेशन होते. विरोधकांसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी होती. विरोधी पक्षनेते शेवटच्या दिवशी उपस्थित राहिले असते तर आनंद झाला असता. पण,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधकांना टोला, पंचामृत थोडे थोडेच दयायचे असते. लोटा भरून दिले तर...
CM EKNATH SHINDE AND NCP LEADER AJIT PAWAR
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Mar 25, 2023 | 7:31 PM
Share

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधकांनी सभात्याग केला. मात्र, विरोधकांच्या अनुपस्थितच सभागृह संस्थगित करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. विधासनभेच्या इतिहासात विक्रमी कामकाज झाले. वेगवेगळ्या विषयावर पहिल्यादाच मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या. नवीन सदस्यांना संधी दिली. राहुल गांधी यांचा विषय खरे तर दोन दिवसांपूर्वीच होता. पण, वरिष्ठांकडून आदेश आला तो पाळावा लागतो. तसे काहीसे आज झाले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अधिवेशनात शेतकरी, कामगार आणि विविध घटक यांच्याबद्दल चांगले निर्णय झाले. विकासाकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प मांडला. मोदी आवास योजना, शबरी योजना आणि नव्या योजना यामधून समाजाला भर देण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी निर्णय घेतले, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नवे राज्यपाल रमेश बैस यांनी जबाबदारी घेतल्यानंतर युती सरकारचे हे पहिले अधिवेशन होते. विरोधकांसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी होती. विरोधी पक्षनेते शेवटच्या दिवशी उपस्थित राहिले असते तर आनंद झाला असता. पण, ही ‘अंदर की बात है.’, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.

गेली तीन वर्ष दोन अधिवेशन चार दिवसांचे व्हायचे. पण, या अधिवेशनात १७ विधेयके संमत झाली. अर्थसंकल्प मांडला. पंचामृत असा अर्थसंकल्प होता. छोट्या घटकासाठी महामंडळे केली. शेतकऱ्यांना नियमाबाहेर जाऊन नुकसान भरपाई दिली. आताही अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकांसाठी परिपूर्ण असा अर्थसंकल्प मांडला. विरोधकांची स्वागत केले आहे. पण, ते कसे बोलतील. अधिवेशनादरम्यान अनेक अडचणी आणल्या. सरकारी कर्मचारी संप झाला. लॉन्ग मार्च आला. पण, सरकारने त्यावर योग्य मार्ग काढला. देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत दिले. पण, ते थोडे थोडे द्यायचे असते. लोटा भरून दिले तर… असे म्हणत मुख्यमंत्री विरोधकांना चांगलाच टोला लगावला.

डोळा मारायचा हा तर नवा सुप्त गुण

या अधिवेशनात विरिधि पक्षनेते अजित पवार यांचा डोळा मारायचा हा नवा सुप्त गुण आपल्याला दिसून आला. आम्ही आधी एकत्र सरकारमध्ये असताना त्यांचा हा गुण कधी दिसून आला नाही, अशी मिश्किली मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार