AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधकांना टोला, पंचामृत थोडे थोडेच दयायचे असते. लोटा भरून दिले तर…

नवे राज्यपाल रमेश बैस यांनी जबाबदारी घेतल्यानंतर युती सरकारचे हे पहिले अधिवेशन होते. विरोधकांसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी होती. विरोधी पक्षनेते शेवटच्या दिवशी उपस्थित राहिले असते तर आनंद झाला असता. पण,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधकांना टोला, पंचामृत थोडे थोडेच दयायचे असते. लोटा भरून दिले तर...
CM EKNATH SHINDE AND NCP LEADER AJIT PAWAR
| Updated on: Mar 25, 2023 | 7:31 PM
Share

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधकांनी सभात्याग केला. मात्र, विरोधकांच्या अनुपस्थितच सभागृह संस्थगित करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. विधासनभेच्या इतिहासात विक्रमी कामकाज झाले. वेगवेगळ्या विषयावर पहिल्यादाच मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या. नवीन सदस्यांना संधी दिली. राहुल गांधी यांचा विषय खरे तर दोन दिवसांपूर्वीच होता. पण, वरिष्ठांकडून आदेश आला तो पाळावा लागतो. तसे काहीसे आज झाले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अधिवेशनात शेतकरी, कामगार आणि विविध घटक यांच्याबद्दल चांगले निर्णय झाले. विकासाकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प मांडला. मोदी आवास योजना, शबरी योजना आणि नव्या योजना यामधून समाजाला भर देण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी निर्णय घेतले, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नवे राज्यपाल रमेश बैस यांनी जबाबदारी घेतल्यानंतर युती सरकारचे हे पहिले अधिवेशन होते. विरोधकांसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी होती. विरोधी पक्षनेते शेवटच्या दिवशी उपस्थित राहिले असते तर आनंद झाला असता. पण, ही ‘अंदर की बात है.’, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.

गेली तीन वर्ष दोन अधिवेशन चार दिवसांचे व्हायचे. पण, या अधिवेशनात १७ विधेयके संमत झाली. अर्थसंकल्प मांडला. पंचामृत असा अर्थसंकल्प होता. छोट्या घटकासाठी महामंडळे केली. शेतकऱ्यांना नियमाबाहेर जाऊन नुकसान भरपाई दिली. आताही अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकांसाठी परिपूर्ण असा अर्थसंकल्प मांडला. विरोधकांची स्वागत केले आहे. पण, ते कसे बोलतील. अधिवेशनादरम्यान अनेक अडचणी आणल्या. सरकारी कर्मचारी संप झाला. लॉन्ग मार्च आला. पण, सरकारने त्यावर योग्य मार्ग काढला. देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत दिले. पण, ते थोडे थोडे द्यायचे असते. लोटा भरून दिले तर… असे म्हणत मुख्यमंत्री विरोधकांना चांगलाच टोला लगावला.

डोळा मारायचा हा तर नवा सुप्त गुण

या अधिवेशनात विरिधि पक्षनेते अजित पवार यांचा डोळा मारायचा हा नवा सुप्त गुण आपल्याला दिसून आला. आम्ही आधी एकत्र सरकारमध्ये असताना त्यांचा हा गुण कधी दिसून आला नाही, अशी मिश्किली मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....