AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : अभिजीत दीपके पुन्हा आक्रमक, महिन्याभरात आणखी एक मोठी घोषणा, फडणवीस सरकारचं टेन्शन वाढणार

अभिजीत दीपके यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महिन्याभरात आणखी एक मोठी घोषणा केली आहे. दीपके यांच्या घोषणनेने फडणवीस सरकारचं टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

Abhijeet Dipke : अभिजीत दीपके पुन्हा आक्रमक, महिन्याभरात आणखी एक मोठी घोषणा, फडणवीस सरकारचं टेन्शन वाढणार
abhijeet dipkeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 4:37 PM
Share

कॉक्रोच जनता पार्टीने ‘स्कूल ठीक करो’ अभियानानंतर आता आणखी एक मोहीमेची घोषणा केली आहे. काही दिवसांआधी कॉक्रोच जनता पार्टीने सरकारी शाळांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी ‘स्कूल ठीक करो’ मोहीम राबवलं होतं. त्यानंतर आता नागपुरात बुधावारी ‘आदिवसी स्कूल ठीक करो’ मोहीमेची घोषणा केली आहे. आता कॉक्रोच जनता पार्टी आदिवासी भागात असलेल्या शाळांची पाहणी करणार आहे. भारतातील गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड या भागात आदीवासी समाजाची मोठी संख्या आहे.

नीट पेपर फुटीच्या विरोधात जंतर-मंतरवर महिनाभर आंदोलन केल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. मागील काही दिवसांपासून ‘स्कूल ठीक करो’ या मोहीमच्या माध्यमातून महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश सारख्या राज्यातील सरकारी शाळांची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. सीजेपीने कर्नाटक, झारखंड, पंजाबमधील काही शाळांची देखील पाहणी केली. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये आदिवावसी विद्यार्थ्यांचा संशयित मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अभिजीत दीपके यांनी संबंधित शाळेची पाहणी केली होती. त्यांनंतर आता त्यांनी आदिवासी भागातील शाळांची पाहणी करण्याची नव्या मोहीमेची घोषणा केली आहे.

अभिजीत दीपके यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके म्हणाले, ‘भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झाली आहेत. त्यानंतरही आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेचा विकास झालेला नाही. वेगवेगळ्या सरकारने आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष केलं आहे. यासाठी कोणतंही एक सरकार दोषी नाही. या स्थितीला सर्व सरकार जबाबदार आहेत, असा आरोप दीपकेंनी केला.

दीपके यांनी पुढे सांगितले की, ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ या मोहिमेतंर्गत आदिवासी भागातील शाळांची पाहणी केली जाईल. या शाळांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली जाईल. विद्यार्थी कोणत्या परिस्थिती शिक्षण घेत आहेत, याची तपासणी केली जाईल. आम्ही सरकारला आवाहन करत आहे की, आदिवासी भागात असलेल्या शाळांची सुधारणा करावी. आदिवासी विद्यार्थ्यांमध्येही क्षमतेची कमतरता नाही. परंतु त्यांना सरकारची मदत मिळत नाही.

सीजेपी प्रमुख दीपके यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रात मागील दोन वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हीच आकडेवारी मुंबईतून आली असती, तर संपूर्ण देशात खळबळ उडाली असतो. परंतु आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाला कोणतीही किंमत नाही का? मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये मागील तीन महिन्यात 30 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला, अशी माहिती दीपकेंनी सांगितली.

Follow Us
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?