AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : लाडकी बहिण योजनेचे पैसे कधीपर्यंत मिळत राहणार? देवेंद्र फडणवीसांकडून महत्वाची अपडेट

केंद्रीय मंत्री विद्यापीठांमध्ये जाऊन जेन झीं शी संवाद साधणार आहेत, यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हा चांगला निर्णय आहे. विद्यापीठं भविष्य निर्माण करणारी केंद्र आहेत. असा संवाद झाला, तर शासन काय करतय, जगाची दिशा काय, हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल. विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा मंत्र्यांना समजतील"

Devendra Fadnavis : लाडकी बहिण योजनेचे पैसे कधीपर्यंत मिळत राहणार? देवेंद्र फडणवीसांकडून महत्वाची अपडेट
Devendra Fadnavis
| Updated on: Aug 20, 2026 | 12:03 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकल विवाहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. लाडक्या बहिणी, वंदे मातरम या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. “दरररोज तीच तीच बातमी काही लोक देतात. त्याची चर्चा करतात. काही नियम आणि निकष होते, त्याची तपासणी कॅगकडून होते. एकही पैसा निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरु केली. पण इतक्या मोठ्या प्रमाणात दोन-चार महिन्यात तपासणी शक्य नव्हती. म्हणून त्यानंतर तपासणी सुरु केली. ई केवायसी त्यात महत्वाचा मुद्दा होता” असं फडणवीस म्हणाले.

“काही लोक नियमाच्या बाहेर जाऊन लाभ घेत होते. वारंवार संधी देऊनही ई-केवायसी केलं नाही. 1 कोटी 65 लाख बहिणींनी ई-केवायसी केलं. ते पात्र ठरले. त्यांना पैसे मिळत आहेत. कुठलाही खंड न पडता पैसे मिळतायत. लाखो बहिणींचा इन्कम टॅक्स पेयी परिवार आहे. इन्कम टॅक्सी पेयी परिवार चालत नाही. ज्या बहिणींना आधाराची, मदतीची गरज आहे, ज्यांना स्वत:च्या पायावर उभं रहायचय. त्यांच्यासाठी हे आहे” असं फडणवीस यांनी सांगितलं.

आजचा जो आकडा आहे, तो 100 टक्के वेरीफाईड

“जे पुरुष लाभीर्थी होते, त्यांच्यावर कारवाई करतोय. ज्या सरकारी कर्मचारी होत्या, सगळ्यांना अप्लाय म्हणून केलं म्हणून त्यांनी केलं,त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल. आजचा जो आकडा आहे, तो 100 टक्के वेरीफाईड आकडा आहे. आमचं सरकार असेपर्यंत त्यांना पैसे मिळत राहतील. आता जे काँग्रेसवाले बोलतायत. तेच लाडक्या बहिणींविरोधात हायकोर्टात गेले होते. मगचमछ के आसू आहेत त्यांचे” अशी टीका फडणवीसांनी केली.

आम्ही मानणार नाही म्हणणं हे मानसिक गुलामगिरीचं लक्षण

राहुल गांधी पुण्यात येऊन तरुणाईशी संवाद साधणार आहेत, यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार, काँग्रेस नेत्यांद्वारे संचलित महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच रजिस्ट्रेशन करण्यात आलय” काँग्रेसने वंदे मातरमचे दोन पॅराच घ्यायच ठरवलय यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा संविधान विरोधी निर्णय आहे. भारतात आता इंग्रजांचं राज्य नाही. स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला हा निर्णय आहे. तो संवैधानिक निर्णय आहे. स्वतंत्र संसदेचा निर्णय आहे. आम्ही मानणार नाही म्हणणं हे मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे”

 

Follow Us
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा