AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेत सर्वात मोठा ट्विस्ट, फडणवीसांनी थेट एक अट ठेवल्याने मोठी खळबळ; काय घडणार?

अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण होणार होते, असे सांगितले जात आहे. यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठे भाष्य केले आहे.

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेत सर्वात मोठा ट्विस्ट, फडणवीसांनी थेट एक अट ठेवल्याने मोठी खळबळ; काय घडणार?
devendra fadnavis and sharad pawar and ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 01, 2026 | 3:20 PM
Share

Devendra Fadnavis On NCP Merger : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरणाबाबत बोलते जात आहे. खासदार शरद पवार, आमदार जयंत पाटील या मोठ्या नेत्यांनी 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनकरण होणार होतं, असं सांगितलं आहे. विशेष म्हणजे या विलीनीकरणासाठी अनेक बैठका झाल्या होत्या, असाही दावा करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांनी मात्र बारामती येथे झालेली बैठक फक्त जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्र लढवण्याबाबतच होती, असे सांगत शरद पवार यांचा दावा खोडून काढला आहे. असे असतानाच आता भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या आहेत. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येत या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठं आणि महत्त्वाचं भाष्य केलं आहे. सोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर त्यासाठी एक अटही समोर ठेवली आहे.

फडणवीसांनी शरद पवार यांचा दावा खोडून काढला

देवेंद्र फडणवीस यांनी आज (1 फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली यावेळी पत्रकारांनी त्यांना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर प्रश्न विचारले. या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून केल्या जाणाऱ्या विलीनीकरणाच्या दाव्याला एका प्रकारे खोडून काढले. अजित पवार आणि आम्ही खूप चर्चा करायचो. दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाची चर्चा होत असती तर अजितदादांनी आम्हाला त्याची कल्पना दिली असती. एकत्रीकरणाबाबत आम्हाला सांगितलं असतं, असं फडणवीस म्हणाले. तसेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा एक स्वतंत्र पक्ष आहे. त्या पक्षाचे निर्णय तेच घेतात, असे सांगत अजितदादांच्या पक्षाच्या अस्तित्त्वावरही भाष्य केले.

फडणवीसांनी ठेवली एक अट

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण होणार तर त्यावर भाजपाची भूमिका काय असेल? याबात थेट भाष्य केले आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार असते तर आम्हाला त्यांबाबत सांगितले गेले असते. आता यापुढेही दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होत असेल तर त्याआधी आमच्याशी चर्चा करावी, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली.

नेमकं काय होणार?

दरम्यान, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत आहे. तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार यांच्या पक्षाला सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेतून बाहेर पडावे लागेल. असे असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सांगितल्यानंतर आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.