CM Uddhav Thackeray: कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत, सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारल्या जाताहेत; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

आपल्यातील रुसवा फुगवा, कटुता निर्माण व्हावी अशा काही लोक मनातल्या मनात गुढ्या उभारत आहेत. कारण त्यांना दुसरा उद्योग नाही. कामाच्या गुढ्या उभारत शकत नाहीत. मग सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत असतात.

CM Uddhav Thackeray: कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत, सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारल्या जाताहेत; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारल्या जाताहेत; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 11:21 AM

मुंबई: आपल्यातील रुसवा फुगवा, कटुता निर्माण व्हावी अशा काही लोक मनातल्या मनात गुढ्या उभारत आहेत. कारण त्यांना दुसरा उद्योग नाही. कामाच्या गुढ्या उभारत शकत नाहीत. मग सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत असतात. त्याला आपण हे दिलेलं आपल्या कृतीतील चोख उत्तर आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना लगावला. हे काम सर्वांचं आहे. आमच्या मनात कुणाच्याही बाबत भेदभाव नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसेच सरकारमध्ये कोणतेही रुसवे फुगवे नाहीत. सरकारचे नाव महाविकास आघाडी (maha vikas aghadi) आहे. ही आघाडी जमिनीवर राहून राज्य विकासाचे नियोजनबद्ध काम करत आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या हस्ते डाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या (gst bhavan) इमारतीचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अनेकदा अनेकजण घोषणा करून नारळ फोडतात पण यातून  फक्त नारळ विक्री वाढते. आपलं तसं नाही. आज आपण प्रत्यक्ष काम सुरु करत आहोत, हा महत्वाचा फरक आहे. हे काम बघितल्यावर आपल्यात कटुता निर्माण करणाऱ्यांना नक्की उत्तर मिळेल. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आपल्या कृतीतून आपण आज चोख उत्तर  दिले आहे. आमच्यात कुठलेही भेदभाव नाहीत हे दाखवून दिले आहे. मनातील संकल्प पूर्ण करायला राज्याच्या तिजोरीत अर्थबळ लागते. वस्तू आणि सेवा कर राज्य अर्थव्यवस्थेचा पाठकणा. तो मजबूत झालाच पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राची बदनामी करू नका

सध्या जे वातावरण निर्माण केले जात आहे, महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहे. त्या महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

कामे मोठ्याने सांगण्याची वेळ आलीय

कायदा सुव्यवस्था चोख राखणाऱ्या पोलीस खात्याच्या अनेक सुविधांचे लोकार्पण आज होत आहे. मराठी अस्मितेचे प्रतिक असलेल्या मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन आणि मेट्रो लाईनचे उद्घाटन आपण करत आहोत. आपण काम करत होतो आणि आहोत. पण आता घेत असलेले कष्ट मोठ्याने सांगण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना छेद देऊन विकास कामे लोकापर्यंत पोहोचवण्याची वेळ आलीय, असं सांगतानाच आज भूमिपूजन होत असलेली इमारत इतकी देखणी असावी की लोकांनी ती पाहण्यासाठी यावी, देशातील जीएसटी विभागाच्या इमारतीपैकी ही इमारत सर्वात देखणी इमारत ठरावी, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

Weather Update: सूर्य आग ओकतोय, 121 वर्षात जे घडलं नाही ते यंदाच्या मार्चमध्ये अनुभवयाला मिळाले

cm uddhav thackeray: तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

Maharashtra News Live Update : बारबाला आणि तिच्या बहिणीवर माजी प्रियकराचा ब्लेड हल्ला

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....