मुद्दा कॉंग्रेसचा, उचलला राष्ट्रवादीने आणि खडसावले मुख्यमंत्री शिंदे यांनी, विधानसभेत नेमकं काय घडलं ?

काँग्रेसचे नाना पटोले यांनी राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. अवकाळी पावसाने थैमान घातले त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केला.

मुद्दा कॉंग्रेसचा, उचलला राष्ट्रवादीने आणि खडसावले मुख्यमंत्री शिंदे यांनी, विधानसभेत नेमकं काय घडलं ?
CM EKNTAHH SHINDE AND AJIT PAWAR Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 12:26 PM

मुंबई : विधानसभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कांदा खरेदीवरून काँग्रेसचे नाना पटोले यांनी मुद्दा उपस्थित केला. मात्र, अध्यक्षांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. त्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसचा मुद्दा त्यांनी लावून धरला. सभागृहात वेलमध्ये उतरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी गदारोळ घातला. अखेर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गदारोळ घालणाऱ्या आमदारांना चांगलेच खडसावले. आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभे आहे असे आश्वासन दिले.

काँग्रेसचे नाना पटोले यांनी राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. अवकाळी पावसाने थैमान घातले त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केला. मात्र, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांचा स्थगन प्रस्ताव फेटाळला. तसेच, नाना पटोले यांना अधिक बोलण्याची संधी नाकारत प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी वेलमध्ये धाव घेतली.

हे सुद्धा वाचा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याच मुद्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. शेतकर्‍यांच्या जीवावर हे सरकार चालेल आहे. लाखाचा पोशिंदा संपतोय. काल महिला दिनी सरकार मदत करेल. शेतकऱ्यांना दिलासा देईल असे वाटले होते. मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई जाहीर करायला हवी होती मात्र ती केलीच नाही अशी टीका केली.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत आहेत हे काय चाललंय आहे. हे सभागृह नियमाने चालते मान्य आहे. पण, शेतकऱ्यांचे प्रश्नच सुटणार नसतील तर काय उपयोग आहे. निव्वळ प्रश्नोत्तरे घेऊन प्रश्न संपणार आहेत का असा सवाल त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे अधिवेशन सुरु असताना राज्यातील शेतकऱ्याने आत्महत्या करणे यापेक्षा दुसरी कोणतीही निकडीची बाब नाही. त्यासाठी सभागृहात मांडलेला स्थगन प्रस्ताव मंजूर करायला हवा. असे न झाल्यास राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे पाप सभागृहाच्या डोक्यावर येईल, असे सांगितले.

मात्र, अध्यक्ष आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना चांगले खडसावले. अजित दादा तुमच्या सरकारमध्ये मी ही मंत्री होतो. त्या सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या दतीची घोषणा केली. पण दिली का? नाही दिली. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना निधी दिला. हे सरकार सामान्यांचे सरकार आहे.

आमच्या सरकारने शेतकऱ्यांना जितका निधी दिला तेवढा निधी कोणत्या सरकारने दिला नाही. अवकाळी पावसाने नुकसान झाले हे मान्य आहे. पण, त्यासाठी मदत देताना काही प्रोसेस असते. नुकसानीचे पंचनामे करावे लागतात. किती नुकसान झाले याचा आढावा घेतला जातो आणि मदत दिली जाते हे तुम्हाला माहित नाही का ? तरीही.. काय दादा… असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या उत्तरावर विरोधकांनी आक्षेप घेतला. वेलमध्ये धाव घेत गदारोळ घालण्यास सुरवात केली. मात्र, अध्यक्षांनी त्याही परिस्थितीत सभागृहाचे काम सुरु ठेवले.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.