AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुद्दा कॉंग्रेसचा, उचलला राष्ट्रवादीने आणि खडसावले मुख्यमंत्री शिंदे यांनी, विधानसभेत नेमकं काय घडलं ?

काँग्रेसचे नाना पटोले यांनी राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. अवकाळी पावसाने थैमान घातले त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केला.

मुद्दा कॉंग्रेसचा, उचलला राष्ट्रवादीने आणि खडसावले मुख्यमंत्री शिंदे यांनी, विधानसभेत नेमकं काय घडलं ?
CM EKNTAHH SHINDE AND AJIT PAWAR Image Credit source: TV9 NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Mar 09, 2023 | 12:26 PM
Share

मुंबई : विधानसभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कांदा खरेदीवरून काँग्रेसचे नाना पटोले यांनी मुद्दा उपस्थित केला. मात्र, अध्यक्षांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. त्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसचा मुद्दा त्यांनी लावून धरला. सभागृहात वेलमध्ये उतरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी गदारोळ घातला. अखेर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गदारोळ घालणाऱ्या आमदारांना चांगलेच खडसावले. आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभे आहे असे आश्वासन दिले.

काँग्रेसचे नाना पटोले यांनी राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. अवकाळी पावसाने थैमान घातले त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केला. मात्र, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांचा स्थगन प्रस्ताव फेटाळला. तसेच, नाना पटोले यांना अधिक बोलण्याची संधी नाकारत प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी वेलमध्ये धाव घेतली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याच मुद्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. शेतकर्‍यांच्या जीवावर हे सरकार चालेल आहे. लाखाचा पोशिंदा संपतोय. काल महिला दिनी सरकार मदत करेल. शेतकऱ्यांना दिलासा देईल असे वाटले होते. मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई जाहीर करायला हवी होती मात्र ती केलीच नाही अशी टीका केली.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत आहेत हे काय चाललंय आहे. हे सभागृह नियमाने चालते मान्य आहे. पण, शेतकऱ्यांचे प्रश्नच सुटणार नसतील तर काय उपयोग आहे. निव्वळ प्रश्नोत्तरे घेऊन प्रश्न संपणार आहेत का असा सवाल त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे अधिवेशन सुरु असताना राज्यातील शेतकऱ्याने आत्महत्या करणे यापेक्षा दुसरी कोणतीही निकडीची बाब नाही. त्यासाठी सभागृहात मांडलेला स्थगन प्रस्ताव मंजूर करायला हवा. असे न झाल्यास राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे पाप सभागृहाच्या डोक्यावर येईल, असे सांगितले.

मात्र, अध्यक्ष आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना चांगले खडसावले. अजित दादा तुमच्या सरकारमध्ये मी ही मंत्री होतो. त्या सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या दतीची घोषणा केली. पण दिली का? नाही दिली. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना निधी दिला. हे सरकार सामान्यांचे सरकार आहे.

आमच्या सरकारने शेतकऱ्यांना जितका निधी दिला तेवढा निधी कोणत्या सरकारने दिला नाही. अवकाळी पावसाने नुकसान झाले हे मान्य आहे. पण, त्यासाठी मदत देताना काही प्रोसेस असते. नुकसानीचे पंचनामे करावे लागतात. किती नुकसान झाले याचा आढावा घेतला जातो आणि मदत दिली जाते हे तुम्हाला माहित नाही का ? तरीही.. काय दादा… असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या उत्तरावर विरोधकांनी आक्षेप घेतला. वेलमध्ये धाव घेत गदारोळ घालण्यास सुरवात केली. मात्र, अध्यक्षांनी त्याही परिस्थितीत सभागृहाचे काम सुरु ठेवले.

Follow Us
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल