AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हनुमान चालीसावाल्या बाईला पाडणे कठीण होते ते…’, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

"विदर्भामध्ये आपला मुख्यमंत्री नाही. भंडारा, गोंदिया याला बारामती बनविणे नाही, पूर्ण विदर्भाला बारामती करणे आहे. मराठवाडामध्ये जागा काँग्रेस जिंकेल. विदर्भ, मराठवाडामध्ये ताकद आहे. 100 जागा होतात. विदर्भ, मराठवाडामध्ये कॉम्प्रमाईज करू नका. कोणत्या सीट द्याच्या त्या दुसऱ्या द्या", असं सतीश चतुर्वेदी नाना पटोले यांना उद्देशून म्हणाले.

'हनुमान चालीसावाल्या बाईला पाडणे कठीण होते ते...', काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य
खासदार नवनीत राणा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 22, 2024 | 9:43 PM
Share

काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांनी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं कौतुक केलं. “अमरावतीमध्ये हनुमान चालीसावाल्या बाईला पाडणे कठीण होते ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. पुण्यात जिंकलो. 58 वर्ष पदवीधर कोणी जिंकले नाही ते काँग्रेस जिंकली. विदर्भामध्ये आपला मुख्यमंत्री नाही. भंडारा, गोंदिया याला बारामती बनविणे नाही, पूर्ण विदर्भाला बारामती करणे आहे. मराठवाडामध्ये जागा काँग्रेस जिंकेल. विदर्भ, मराठवाडामध्ये ताकद आहे. 100 जागा होतात. विदर्भ, मराठवाडामध्ये कॉम्प्रमाईज करू नका. कोणत्या सीट द्याच्या त्या दुसऱ्या द्या”, असं सतीश चतुर्वेदी नाना पटोले यांना उद्देशून म्हणाले.

“आम्ही आपापसात लढत होतो म्हणून भाजपचा जन्म झाला. नागपुरात कोणाची हिम्मत नाही काँग्रेसला हरविण्याची. मात्र आम्ही आमच्यात लढत होतो म्हणून भाजप पुढे आला. नागपूर हे धर्मनिरपेक्ष शहर आहे. काँग्रेसचे शहर आहे. काँग्रेस नागपूरमध्ये 13 वेळ जिंकली आहे”, असं सतीश चतुर्वेदी म्हणाले.

“नाना पटोले यांना राज्याचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी सगळे झटतील. काँग्रेसमध्ये फ्रॉम भरे पर्यत धाकधूक असते. त्यामुळे काँग्रेसचं तिकीट आणणं कठीण, जिंकणं सोपं आहे. विदर्भातील सहाच्या 6 जागा आणा. त्या निवडून आणू. नानाभाऊ तुम्हाला आशिर्वाद आहे, लोकांचा तुमच्या भागातील हनुमानजीचा आहे. सध्या माहोल हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातला आहे”, असा दावा सतीश चतुर्वेदी यांनी केला.

नवनीत राणा यांनी ठाकरेंच्या घराबाहेर वाचलेली हनुमान चालीसा

नवनीत राणा आणि त्यांचे आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण करत अनोखं आंदोलन केलं होतं. त्यांच्या या आंदोलनामुळे वातावरण प्रचंड तापलं होतं. या प्रकरणावरुन पोलिसांनी राणा दाम्पत्य यांना अटक केली होती. त्यांना बरेच दिवस या घटनेमुळे जेलमध्ये राहावं लागलं होतं.

Follow Us
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?