AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवलेंची नाराजी दूर, देवेंद्र फडणवीसांकडून मिळालं मोठं आश्वासन!

विधानसभेसाठी आरपीआयला एकच जागा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमधे नाराजी होती, मात्र ती आता दूर झाल्याचा दावा आठवले यांनी केला आहे.

आठवलेंची नाराजी दूर, देवेंद्र फडणवीसांकडून मिळालं मोठं आश्वासन!
ramdas athwale
| Updated on: Nov 01, 2024 | 5:42 PM
Share

राज्यात विधानसभेचं बिगूल वाजलं आहे, जागा वाटप होऊन उमेदवारी अर्ज देखील दाखल झाले आहेत. आता प्रचारात रंगत आली आहे, मात्र तरी देखील महायुती आणि महाविकास आघाडीमधील काही घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून अजूनही नाराजी दिसून येते आहे. याचा फटका हा निवडणुकीत बसू शकतो त्यामुळे बड्या पक्षांकडून मित्र पक्षांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयला राज्यात केवळ एकच जागा मिळाली आहे. यावर आता पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले? 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष असला तरी ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत सोपी आहे.  लोकसभेला महाराष्ट्रात नरेटीवमुळे आमचं मोठं नुकसान झालं. तरी लोकसभेला आम्हाला झालेलं मतदान हे मोठं आहे. महायुतीला विधानसभेत 170 पर्यंत जागा मिळतील. आरपीआयला एकच जागा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमधे नाराजी होती, मात्र मी ती दूर केली आहे. विधानसभेला जरी एक जागा असेल तरी आम्हाला एक विधानपरिषद आणि सत्ता आल्यावर मंत्रिपद देण्याचं आश्वासन फडणवीस आणि शिंदे यांनी दिल्याचा दावा आठवले यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महायुतीचे 17 उमेदवार लोकसभेला जिंकले त्यात आमच्या पक्षाची मतं देखील आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी भाजप उमेदवार शायना एनसी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद सावंत हे तसे चांगलं कल्चर असलेले खासदार आहेत, शायना एनसी यांना माल म्हणणे ही गंभीर बाब आहे. त्यांचा अपमान म्हणजे सगळ्या महिलांचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करावी. सोबतच महिला आयोगाने देखील याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.