Devendra Fadnavis: कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे नातेवाईकांना दिले; फडणवीसांचा आघाडीवर गंभीर आरोप

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या आधी कोरोना (corona) काळात भ्रष्टाचार झाल्याचं सांगून सरकारला घेरलं होतं. आता त्यांनी कोरोना काळातील आणखी एका भ्रष्टाचारावरून सरकारला घेरलं आहे.

Devendra Fadnavis: कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे नातेवाईकांना दिले; फडणवीसांचा आघाडीवर गंभीर आरोप
कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे नातेवाईकांना दिले; फडणवीसांचा आघाडीवर गंभीर आरोप Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 4:37 PM

गडचिरोली: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या आधी कोरोना (corona) काळात भ्रष्टाचार झाल्याचं सांगून सरकारला घेरलं होतं. आता त्यांनी कोरोना काळातील आणखी एका भ्रष्टाचारावरून सरकारला घेरलं आहे. कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे या लोकांनी आपल्या नातेवाईंकाना दिले आहेत. वेश्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे सर्वांना माहीत आहे. संजय राऊत (sanjay raut) तो शब्द नेहमी वापरत असतात. असे काही लोक या सरकारमध्ये आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सत्तापक्षाचे नेते धान खरेदी केंद्रांचे मालक होत आहेत. आमच्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस हे सरकार देत नाही, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला. तसेच हे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजपच्या महाजनआक्रोश मोर्चाची सुरूवात गडचिरोलीपासून झाली. कारण, गडचिरोलीपासून बुलंद होणारा आवाज हा क्रांती घडवितो. धानाला बोनस, कृषीपंपाला 24 तास वीज, वीजतोडणी बंद करणे, कर्जमाफी आणि अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी, अवकाळी, अतिवृष्टी, वादळ, किडीची मदत तत्काळ देण्यात यावी, नवाब मलिक यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा अशा विविध 16 मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. या महाविकास सरकारमध्ये भ्रष्टाचाराची ट्वेंटि-ट्वेंटी सुरू आहे. मुंबईतील बिल्डरांचा कर थकला आहे, हिंमत असेल तर तो वसूल करा. त्यांच्याकडून मालपाणी मिळते, म्हणून तेथे ढिल आणि आमच्या शेतकर्‍यांकडून जुलमी वसुली सुरू, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सरकारला बेवड्यांची चिंता

बारमालकांची फी 50 टक्के कमी केली. पण, गडचिरोली, नंदूरबारमध्ये शेतकर्‍यांचे वीजबिल 50 टक्के कमी करावं असं त्यांना वाटले नाही. विदेशी दारुवर कर अर्धा केला. पण, शेतकर्‍यांना कोणतीही मदत केली नाही. या सरकारला गरिबांची नाही, तर बेवड्यांची चिंता अधिक आहे, अशी टीका त्यांनी केली.

सामान्य जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला

धानाचे पैसे किती जिल्ह्यांना द्यायचे. विदर्भातील 5 आणि कोकणातील 3 जिल्हे. पण, हे 125 कोटी रुपये सुद्धा सरकार द्यायला तयार नाही. मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचा अध्यक्ष 400 कोटींचा भ्रष्टाचार करतो. काय सांगायचे? बांधावर जाऊन 50 हजार देऊ. पण, आज स्थिती काय आहे? 5 हजार रुपये शेतकर्‍यांना द्यायला तयार नाही. आमच्या पाठित सोडा, या सरकारने सामान्य माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा हल्ला त्यांनी केला.

आदिवासींच्या तोंडचा घास पळवणारे सरकार

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सामान्यांचा विचार करीत नसले तरी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सरकार सामान्यांचा विचार करते. त्यांच्याकडून अधिकाधिक मदत प्रत्येकाला मिळते आहे. राज्यातील आघाडी सरकारने आदिवासींसाठीच्या अन्नधान्याच्या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. कुत्रा देखील खाणार नाही, असे धान्य आदिवासींना देण्यात येते आहे. आदिवासींच्या तोंडचा घास पळविणारे हे पापी सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.

तोपर्यंत आरक्षण संपू देणार नाही

मतांसाठी ओबीसींचा वापर करतात. ओबीसींसाठी पहिला संवैधानिक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तयार केला. मात्र, महाविकास सरकारने ओबीसींचे आरक्षण घालविले. ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र होते आहे. भाजपाचा कार्यकर्ता जिवंत आहे, तोवर हे आरक्षण संपू देणार नाही. अखेरच्या क्षणापर्यंत भाजपा ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करीत राहील, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

संबंधित बातम्या:

Video Devendra Fadnavis | राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 मॅच; देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका, गडचिरोलीतून भाजपचा जनआक्रोश मोर्चा

Arvind Sawant: मनसे बिनबुडाची झालीय, मनसेला बुड नाही आणि शेंडाही नाही; अरविंद सावंत यांची खोचक टीका

मोठी बातमी! पाकिस्तानची बोट भारताच्या हद्दीत घुसली, BSF जवानांकडून बोट जप्त

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.