AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदान वाढवल्याचा ठाकरेंकडून आरोप, फडणवीसांचं सडेतोड उत्तर, वातावरण तापलं

विधानसभेत 40 ते 42 लाख मतदार वाढवले गेले आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला आहे, या आरोपाला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

मतदान वाढवल्याचा ठाकरेंकडून आरोप, फडणवीसांचं सडेतोड उत्तर, वातावरण तापलं
| Updated on: Aug 24, 2025 | 3:32 PM
Share

विरोधकांकडून सध्या मतदान चोरी आणि ईव्हीएमवरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. यावरून राज्यात आता चांगलंच वातावरण तापलं आहे. विधानसभेत 40 ते 42 लाख मतदार वाढवले गेले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. वाढवले गेलेले मतदार कोण ते तपासा, त्यांना मतदान करू देऊ नका, असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. आजपासूनच मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या आरोपांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

‘असं म्हटलं आहे, दिल बहलाने केलीये खयाल अच्छा है गालीब, मी यावर एवढंच म्हणेल.’ असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की,  जोपर्यंत सत्य स्विकारणार नाही तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल. पहिल्यांदा यांनी लक्षात घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकले 2014 ला तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचं राज्य होतं. देशातही काँग्रेसचं राज्य होतं. पंधरा- पंधरा वर्ष काँग्रेसंच राज्य होतं. त्यामुळे आपण का हारतो आहोत? किंवा लोकांनी आपल्याला का नाकारलं याचा अभ्यास न करता जोपर्यंत ते छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत ते सत्तेत येऊ शकत नाहीत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही ते बघा, निवडणुकीच्या दिवशी जे मतदार नाहीयते त्यांच्या नावानं बोगस मतदान होतं. काही ठिकाणी दोबार तिबार मतदान होतं. त्यामुळे आता डोळ्यात तेल घालून घरोघरी जाऊन मतदार यादी चेक करा. आणि गेल्या निवडणुकीत जी मतदान चोरी झाली, लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास 42 -42 लाख मतदान आपल्या महाराष्ट्रात वाढवलं गेलं, हे वाढलेलं मतदार कोण आहेत? ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था