AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MIM आणि शिवसेना कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल; फडणवीसांचा घणाघात

एमआयएमने (MIM) काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर दिली आहे. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) येणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी टीका केली आहे.

MIM आणि शिवसेना कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल; फडणवीसांचा घणाघात
MIM आणि शिवसेना कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल; फडणवीसांचा घणाघात Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 12:22 PM
Share

नागपूर: एमआयएमने (MIM) काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर दिली आहे. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) येणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी टीका केली आहे. एमआयएमने त्यांच्यासोबत जावं. ते शेवटी एकच आहेत. भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी ते काय करत आहेत ते पाहू. शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी शिवसेनेला टोले लगावले आहेत.

लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींना पाहून लोक मतदान करतात. विकासाला मतदान करतात. हे लोक एकत्रं आले तरी काही फरक पडणार नाही. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल. जे लोक अजानची स्पर्धा घेऊ शकतात ते काहीही करू शकतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

जेलमध्ये असताना मंत्रिपद कसे?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत. त्यांना बिनखात्याचे मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपची 50 टक्के मागणी मान्य झालीय का? असा सवाल करण्यात आला. त्यावर 50 टक्के मागणी स्वीकारून फायदा नाही. शेवटी संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती जेलमध्ये असताना त्यांनी पदावर राहणं योग्य नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राजू शेट्टींबाबत चर्चा झाली नाही

शेतकरी नेते राजू शेट्टी भाजपसोबत येणार का? असा सवालही त्यांनी करण्यात आला. त्यावर माझी याबाबत चर्चा झाली नाही. राजू शेट्टी आमच्यासोबत होते. काही कारणाने ते पलिकडे गेले. सोबत कोण येणार, नाही येणार हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. मोदींनी जेवढे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतले तेवढे कोणी घेतले नाही. साखर कारखानदारीबाबत जे निर्णय घेतले ते कोणीच घेतले नाही. त्याचा विचार शेतकरी नेत्यांनी केला पाहिजे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Aurangabad | भाजपाला हरवण्यासाठी MIM महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार, Imtiaz Jaleel यांचं मोठं विधान

Medical कॉलेजचा पदव्युत्तर अभ्यासक्रम यावर्षी होणार सुरू; राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुखद धक्का!

नाशिकमधील Corona निर्बंध मागे; कधीपासून अंमलबजावणी, पालकमंत्री भुजबळांनी काय दिले निर्देश?

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......