MIM आणि शिवसेना कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल; फडणवीसांचा घणाघात

एमआयएमने (MIM) काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर दिली आहे. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) येणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी टीका केली आहे.

MIM आणि शिवसेना कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल; फडणवीसांचा घणाघात
MIM आणि शिवसेना कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल; फडणवीसांचा घणाघात Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 12:22 PM

नागपूर: एमआयएमने (MIM) काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर दिली आहे. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) येणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी टीका केली आहे. एमआयएमने त्यांच्यासोबत जावं. ते शेवटी एकच आहेत. भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी ते काय करत आहेत ते पाहू. शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी शिवसेनेला टोले लगावले आहेत.

लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींना पाहून लोक मतदान करतात. विकासाला मतदान करतात. हे लोक एकत्रं आले तरी काही फरक पडणार नाही. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल. जे लोक अजानची स्पर्धा घेऊ शकतात ते काहीही करू शकतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

जेलमध्ये असताना मंत्रिपद कसे?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत. त्यांना बिनखात्याचे मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपची 50 टक्के मागणी मान्य झालीय का? असा सवाल करण्यात आला. त्यावर 50 टक्के मागणी स्वीकारून फायदा नाही. शेवटी संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती जेलमध्ये असताना त्यांनी पदावर राहणं योग्य नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राजू शेट्टींबाबत चर्चा झाली नाही

शेतकरी नेते राजू शेट्टी भाजपसोबत येणार का? असा सवालही त्यांनी करण्यात आला. त्यावर माझी याबाबत चर्चा झाली नाही. राजू शेट्टी आमच्यासोबत होते. काही कारणाने ते पलिकडे गेले. सोबत कोण येणार, नाही येणार हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. मोदींनी जेवढे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतले तेवढे कोणी घेतले नाही. साखर कारखानदारीबाबत जे निर्णय घेतले ते कोणीच घेतले नाही. त्याचा विचार शेतकरी नेत्यांनी केला पाहिजे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Aurangabad | भाजपाला हरवण्यासाठी MIM महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार, Imtiaz Jaleel यांचं मोठं विधान

Medical कॉलेजचा पदव्युत्तर अभ्यासक्रम यावर्षी होणार सुरू; राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुखद धक्का!

नाशिकमधील Corona निर्बंध मागे; कधीपासून अंमलबजावणी, पालकमंत्री भुजबळांनी काय दिले निर्देश?

Non Stop LIVE Update
राज्यातील सर्वंच आमदारांना अनुभव येणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य काय
राज्यातील सर्वंच आमदारांना अनुभव येणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य काय.
नकाबचा जवाब द्यावाच लागेल, फडणवीसांच्या पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?
नकाबचा जवाब द्यावाच लागेल, फडणवीसांच्या पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?.
मी बकरा नाही तर...नीलम गोऱ्हे यांच्या 'त्या' टीकेवर राऊतांचा पलटवार
मी बकरा नाही तर...नीलम गोऱ्हे यांच्या 'त्या' टीकेवर राऊतांचा पलटवार.
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ.
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.