उचलीचे पैसे परत दे, नाहीतर…; बीडच्या चौघांकडून 16 वर्षांच्या मुलाचं अपहरण, आईला फोन करून धमकी
धाराशिवात एका 16 वर्षांच्या मुलाचं अपहण झाल्याची घटना घडली आहे. आरोपी बीडचे असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाराशिवमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धाराशिवमध्ये ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धाराशिवच्या तालुक्यातील पळसपमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीडच्या 4 जणांनी अल्पवयीन मुलाचा अपरहण केल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर या प्रकरणी बीड जिल्ह्यातील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण धाराशिवमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील पळसप येथे ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून १६ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ‘उचलीचे पैसे परत दे, नाहीतर कामावर ये’ असा तगादा लावत मुलाला मारहाण करून बळजबरीने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपहरणानंतर आरोपींनी मुलाच्या आईला फोन करून ‘पैसे दे आणि मुलाला घेऊन जा, नाहीतर मुलाला सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी मुकादमासह बीड जिल्ह्यातील चौघांविरोधात ढोकी पोलिस ठाण्यात अपहरणासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई
पुणे पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन राठोडला अटक केली. त्याने गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून 88 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्याच्या विरोधात एप्रिल 2023 मध्ये पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्ह्याचा तपास आर्थिक व गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मोठी कारवाई केली. अविनाश राठोड, त्याची पत्नी विशाखा राठोड आणि त्याच्या इतर साथीदारांनी गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आश्वासन देऊन गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचे समोर आलंय. या फरार आरोपीला दुबईतून भारतात आणले आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कोर्टाने त्याला 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
