AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur : ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जात असून भीषण धुळीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, शाळेत जायला विद्यार्थी घाबरतात

चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणी इथल्या नागरिकांसाठी शाप होत चालल्या आहेत. देशभर टेकड्यांच्या भूस्खलनाची चर्चा जनजीवन विस्कळीत होणे व पुनर्वसन या दिशेने सुरू आहे.

Chandrapur : ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जात असून भीषण धुळीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, शाळेत जायला विद्यार्थी घाबरतात
chandrapur coal mineImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 11, 2023 | 8:33 AM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या सास्ती लगतच्या गोवरी-पोवनी-साखरी-माथरा या खेड्यांमध्ये कोळसा खाणीच्या (coal mines) ब्लास्टिंगमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रचंड धुळीमुळे शेतशिवारे मातीमोल झाली आहेत, तर शालेय विद्यार्थी देखील जीव मुठीत धरून शाळेत जात आहेत. गावातील नागरिकांचे व जनावरांचे आरोग्य प्रचंड ब्लास्टिंग आणि उडत असलेल्या धुरळ्यामुळं धोक्यात आलं आहे. तिथल्या नागरिकांनी तिथल्या यावर उपाय काढावा अशी मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 50 हून अधिक कोळसा खाणी आहेत. मात्र यातील खुल्या कोळसा खाणी आसपासच्या खेड्यांसाठी शापचं ठरल्याची चर्चा आहे. राजुरा तालुक्यातील (Rajura Taluka) सास्ती परिसरातल्या गोवरी व अन्य सात गावांमध्ये कोळसा खाणीतील महाप्रचंड ब्लास्टिंग व त्यातून निघणाऱ्या धुळीने जनजीवन त्रासदायक केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणी इथल्या नागरिकांसाठी शाप होत चालल्या आहेत. देशभर टेकड्यांच्या भूस्खलनाची चर्चा जनजीवन विस्कळीत होणे व पुनर्वसन या दिशेने सुरू आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील खुल्या कोळसा खाणीच्या आसपास असणाऱ्या खेड्यांची स्थिती त्याहून भीषण असल्याची नागगिरकांचं म्हणणं आहे.

जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या सास्ती परिसरात असलेल्या गोवरी-पोवनी -माथरा व अन्य सहा गावांनी गेली काही वर्षे कोळसा खाणीत होणाऱ्या अतिप्रचंड ब्लास्टिंगचा त्रास अनुभवला आहे. या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जात असून भीषण धुळीमुळे जनजीवन धुळमय झाले आहे. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था देखील अतिशय वाईट आहे. हे चिमुकले दहशतीत शिक्षण घेत आहेत. महाभयानक ब्लास्टिंग मुळे संपूर्ण धरणी हादरल्यावर मुलं एका खोलीत गोलाकार बसून भीतीदायक वातावरणात ती काही मिनिटं घालवतात अशी माहिती विद्यार्थी हितेश विधाते याने सांगितली आहे.

शेतीची अवस्था वाईट आहे. खुल्या कोळसा खाणीसाठी शेकडो हेक्टर जमिनी अधिग्रहित झाल्याने शेतकऱ्यांची दैनंदिनी उद्ध्वस्त झाली आहे. त्याचबरोबर हाती पैसा आला असला तरी तो गुंतवण्यासाठी योग्य मार्गदर्शन नसल्याने या भागातील शेतकरी शांत झालाय. ज्यांच्याकडे थोडी शेती आहे त्यांना कोळसा खाणीतील ब्लास्टिंग, त्यातून निघणारी रोजची अतिप्रचंड धूळ, त्याचे पिकावर होणारे विपरीत परिणाम, नापिकी व शेवटी आत्महत्या अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशी व्यथा दिलीप वैद्य, शेतकरी यांनी मांडली.

कोळसा खाण जुनी असली तर गेली दोन वर्षे या खाणीतील ब्लास्टिंगचा त्रास वाढल्याची तक्रार स्थानिक लोक करत आहेत. ब्लास्टिंग व धुळीचा गावातील प्रत्येक घटकावर विपरीत परिणाम होत असून यासंदर्भात कुठलीही नुकसान भरपाई दिली जात नसल्याने नागरिकांचे जीवनस्तर खालावत चालला आहे. या भागातील नागरिक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचं माथरा सरपंच हरिदास झाडे यांनी सांगितलं.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.