AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | सभेला गर्दी झाली नाही, आयोजकांनी लढवली नामी शक्कल

Eknath Shinde: जळगाव शहरालगत खेडी शिवारात ५५ एकरांच्या भूखंडावर भव्य आणि सुसज्य जिल्हा वारकरी भवन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यायला तब्बल तीन ते चार तास उशीर झाल्यामुळे नागरिकांची गर्दी झाली नाही. वारकरी कार्यक्रमाला आले नाही. त्यामुळे खुर्च्या रिकाम्या होत्या.

Video | सभेला गर्दी झाली नाही, आयोजकांनी लढवली नामी शक्कल
सभास्थळी मध्ये असा पडदा टाकून मंडप झाकून ठेवण्यात आला.
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 05, 2024 | 4:19 PM
Share

किशोर पाटील, जळगाव | दि. 5 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जळगाव शहरातील राज्यातील पहिलेच असे वारकरी भवनाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी रिकाम्या खुर्च्या दिसू नये म्हणून आयोजकांनी अनोखी शक्कल लढवण्याचा पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी रिकाम्या खुर्च्या होत्या त्या ठिकाणापासून मध्येच मंडप लावून त्या खुर्च्या दिसू नये या पद्धतीने झाकण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र पाहायला मिळालं.

मुख्यमंत्र्यांना चार तास उशीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यायला तब्बल तीन ते चार तास उशीर झाल्यामुळे नागरिकांची गर्दी झाली नाही. वारकरी कार्यक्रमाला आले नाही. त्यामुळे खुर्च्या रिकाम्या होत्या, असे आयोजकांकडून सांगण्यात आलं. मात्र त्या रिकाम्या खुर्च्या दिसू नये म्हणून जगण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे मात्र यावेळी स्पष्टपणे दिसून आलं. खुर्च्या रिकाम्या खुर्च्या दिसू नये, असा मंडप टाकण्यात आल्यानंतर पलीकडच्या बाजूला नागरिकांना जेवण्याची व्यवस्था तसेच फूड पॅकेट देण्याची व्यवस्था करण्यात आल्याच आयोजकांकडून कार्यक्रमावेळी सांगण्यात येत होतं. मुख्यमंत्र्यांच या ठिकाणी भाषण होणार असतानाही खुर्च्या रिकाम्या दिसू नये म्हणून आयोजकांनी किंवा प्रशासनाने लढविलेल्या या अनोख्या शकलीची यावेळी एकच चर्चा होती.

५५ एकरांच्या भूखंडावर भव्य भवन

जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातल्या पहिल्या असलेल्या वारकरी भवनाचे भूमिपूजन झाले. जळगाव शहरालगत खेडी शिवारात ५५ एकरांच्या भूखंडावर भव्य आणि सुसज्य जिल्हा वारकरी भवन होणार आहे. गुलाबराव पाटील यांनी तुम्ही अनेक विकास कामे केली असतील मात्र आज असे काम वारकऱ्यांच्या दृष्टीने आज महत्त्वाचं काम तुम्ही करत आहेत त्यामुळे मी तुम्हाला शुभेच्छा देतो, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटील यांचे कौतूक केले.

पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकीला लाखो लोक जातात. पंढरपूरची आषाढीला पूजन पूजा करण्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलं. खऱ्या अर्थाने त्या पंढरपूर बरोबर इतर आज पंढरपूरचा विकास आपण करतोय. त्या ठिकाणी आपण आपलं जे काही काम आहे, ते सुरू केले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!