AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोबी तीन रुपये किलो, टोमॅटो दहा रुपयांखाली, नवी मुंबई APMC मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती गडगडल्या

दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबईसह नवी मुंबईलाही बसला (APMC Market food rate decrease) आहे.

कोबी तीन रुपये किलो, टोमॅटो दहा रुपयांखाली, नवी मुंबई APMC मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती गडगडल्या
| Edited By: | Updated on: Aug 07, 2020 | 10:28 AM
Share

नवी मुंबई : दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबईसह नवी मुंबईलाही बसला (APMC Market food rate decrease) आहे. त्यासोबतच नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटलाही याचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. पावसामुळे एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात भाजीपाल्यांच्या दरात 70 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे भाज्या आता स्वस्त झाल्या आहेत. तर बाजारात 50 टक्के माल अजूनही शिल्लक राहिला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे (APMC Market food rate decrease).

दोन दिवसात कोबीचा भाव 3 रुपये किलो, टोमॅटो 5 ते 10 रुपये किलो, पडवळ 8 रुपये किलो, भेंडी 10 रुपये किलो, फरसबी 12 रुपये किलो, वांगी 5 रुपये किलो, दुधी 7 रुपये किलो या किमती सध्या बाजारात विक्रीसाठी चालू आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 275 गाड्यांची आहे. तसेच दरही 60 ते 70 टक्क्यांनी उतरले आहेत. साधारणपणे लॉकडाऊन काळात बाजारात 300 गाड्यांची आवक असतात. आज एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 275 गाड्याची आवक झाली असून बाजारात मोठ्या प्रमाणात भावात घसरण झाली आहे. त्यामुळे 15 दिवसांपासून महागड्या भाज्या खरेदी करणाऱ्यांना आता दिलासा मिळत आहे.

“या दोन दिवसात आमचं खूप पटीने नुकसान झालं आहे. जवळजवळ 50% माल तसाच शिल्लक राहिला आहे. या वादळीपावसामुळे कोणी मार्केटमध्ये खरेदी करायला आलं नाही आणि बाजारामध्ये 70% घसरण झाली आहे. 30% माल असाच ठेवून कुजून जात आहे, त्यामुळे माल फेकावा लागत आहे. या पावसामुळे एपीएमसी भाजीपाला घाऊक मार्केटमध्ये देखील खूप नुकसान झालं आहे. ग्राहक नसल्या कारणाने माल ठेवून ठेवून खराब होऊन फेकायला लागत आहे”, असं व्यापारी रविंद्र जाधव यांनी सांगितले.

घाऊक बाजारातील किलोचे दर रुपयांत

लाल भोपळा 5 ते 7

भेंडी नं. 1- 15 ते 18

भेंडी नं. 2- 10 ते 12

फ्लॉवर 5 ते 8

कोबी 3 ते 5

दुधी भोपळा 7 ते 9

टोमॅटो 5 ते 10

वांगी 5 ते 7

तोंडली 8 ते 10

पडवळ 8 ते 10

ढोबळी मिरची 10 ते 15

कारली 8 ते 10

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत चार महिन्यांनी मॉल सुरु, एका दिवसात बंद

Navi Mumbai Rain | नवी मुंबईत मुसळधार पाऊस, रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक कोंडी

Follow Us
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.