AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद नामांतरावरुन माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक, काय दिला इशारा…

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले त्याची घोषणाही झाली मात्र अजून राजपत्र न काढल्याने हर्षवर्धन जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

औरंगाबाद नामांतरावरुन माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक, काय दिला इशारा...
Image Credit source: Google
| Updated on: Dec 15, 2022 | 9:10 AM
Share

दत्ता कानवटे, औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा तापला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील आक्रमक होऊ लागले आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यावरून माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक झाल्याने हा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी राजपत्रच काढला नसल्याचा हर्षवर्धन जाधव यांनी दावा केला आहे. नाव बदलण्याच्या नावाखाली राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप ही हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याबाबत घोटाळा झाल्याचा हर्षवर्धन जाधव यांनी आरोप केला असून शहराचे नाव बदलण्यासाठी मैदानात उतरण्याचा इशारा देखील दिला आहे. सुरुवातीपासूनच औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन मतमतांतरे आहेत.

महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची स्थिती असतांना औरंगाबाद शहराचे नामांतर करण्यात आले होते.

त्यानंतर सत्तेत आलेले शिंदे सरकार यांनी महाविकास आघाडी सरकारने नामांतर केलेला निर्णय रद्द करून पुन्हा नवीन निर्णय घेतला होता.

त्याबाबत राज्यातील काही शहरांचे नाव बदलण्यात आले होते, त्यापैकी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले होते.

अनेक ठिकाणी तसा उच्चार केला जातो, अनेक ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे लिहिलेले बघायला मिळाले. इतकेच काय महाराष्ट्र शासनाच्या शिवशाही बसवर बघायला मिळाले.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले त्याची घोषणाही झाली मात्र अजून राजपत्र न काढल्याने हर्षवर्धन जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला असून सरकारवर टीका केली आहे, त्यामुळे येत्या काळात नामांतराचा पुन्हा एकदा तापणार हे निश्चित झाले आहे.

त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत काय भूमिका घेते, जाधव यांची भूमिका पाहता राजपत्र काढले जाते का ? याकडे लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.