AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद नामांतरावरुन माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक, काय दिला इशारा…

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले त्याची घोषणाही झाली मात्र अजून राजपत्र न काढल्याने हर्षवर्धन जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

औरंगाबाद नामांतरावरुन माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक, काय दिला इशारा...
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 15, 2022 | 9:10 AM
Share

दत्ता कानवटे, औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा तापला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील आक्रमक होऊ लागले आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यावरून माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक झाल्याने हा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी राजपत्रच काढला नसल्याचा हर्षवर्धन जाधव यांनी दावा केला आहे. नाव बदलण्याच्या नावाखाली राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप ही हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याबाबत घोटाळा झाल्याचा हर्षवर्धन जाधव यांनी आरोप केला असून शहराचे नाव बदलण्यासाठी मैदानात उतरण्याचा इशारा देखील दिला आहे. सुरुवातीपासूनच औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन मतमतांतरे आहेत.

महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची स्थिती असतांना औरंगाबाद शहराचे नामांतर करण्यात आले होते.

त्यानंतर सत्तेत आलेले शिंदे सरकार यांनी महाविकास आघाडी सरकारने नामांतर केलेला निर्णय रद्द करून पुन्हा नवीन निर्णय घेतला होता.

त्याबाबत राज्यातील काही शहरांचे नाव बदलण्यात आले होते, त्यापैकी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले होते.

अनेक ठिकाणी तसा उच्चार केला जातो, अनेक ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे लिहिलेले बघायला मिळाले. इतकेच काय महाराष्ट्र शासनाच्या शिवशाही बसवर बघायला मिळाले.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले त्याची घोषणाही झाली मात्र अजून राजपत्र न काढल्याने हर्षवर्धन जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला असून सरकारवर टीका केली आहे, त्यामुळे येत्या काळात नामांतराचा पुन्हा एकदा तापणार हे निश्चित झाले आहे.

त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत काय भूमिका घेते, जाधव यांची भूमिका पाहता राजपत्र काढले जाते का ? याकडे लक्ष लागून आहे.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर