AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडचिरोलीत गोदावरी नदीपात्रात 8 तरुण बुडाले, शोध मोहिम सुरु

गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात गोदावरी नदीत आठ तरुण अंघोळीसाठी गेले असता सहा तरुण पाण्यात बेपत्ता झाले. दोन तरुणांना वाचवण्यात आले आहे. तेलंगणाच्या अंबडपल्ली येथील ही घटना आहे. बेपत्ता तरुणांचा शोध मोहीम सुरू आहे. प्रवाहाचा वेग जास्त असल्याने हे तरुण पाण्यात वाहून गेले असण्याची शक्यता आहे.

गडचिरोलीत गोदावरी नदीपात्रात 8 तरुण बुडाले, शोध मोहिम सुरु
Gadchiroli drowning
| Updated on: Jun 07, 2025 | 10:11 PM
Share

गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेले 8 जण बेपत्ता झाले आहे. या 8 युवकांपैकी 2 जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. मात्र 6 जण पाण्यात बेपत्ता झाले आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील अंबडपल्ली भागात संध्याकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. अंबडपल्ली येथील गोदावरी नदीच्या पात्रात हे आठ युवक अंघोळीसाठी गेले होते. मात्र, गोदावरी नदीत पाण्याचा प्रवाह जास्त होतो. या तरुणांना प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे वाहत्या पाण्यात ते वाहून गेले. हे सर्व बेपत्ता युवक २० वर्षांखाली आहेत.

सहा युवकांचा अजूनही बेपत्ता

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. स्थानिकांच्या प्रयत्नांमुळे दोन युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, उर्वरित सहा युवकांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. बेपत्ता झालेल्या युवकांचा शोध घेण्यासाठी गोदावरी नदीच्या काठावर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बेपत्ता झालेल्या युवकांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बेपत्ता झालेल्यांची नावे

  • पत्ती मधुसूदन (१५)
  • पत्ती मनोज (१३)
  • कर्नाळा सागर (१४)
  • तोगरी रक्षित (११)
  • पांडू (१८)
  • राहुल (१९)

नातेवाईकांचा आक्रोश

या घटनेनंतर मुलांचे नातेवाईक आणि त्यांच्या कुटुंबियांनी गोदावरी नदीकाठी गर्दी केली. बुडालेली ही मुले सुखरुप परत यावीत, अनेकजण प्रार्थना करत होता. यावेळी काळीज पिळवटणाऱ्या आक्रोशामुळे परिसर सुन्न झाला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.