AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्डिंग पडलं हे तर देवाचं कृत्य… घाटकोपर दुर्घटनेतील आरोपीचा अजब तर्क; जामिनासाठीच्या याचिकेतील युक्तिवाद काय?

घाटकोपर होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घटना 'ॲक्ट ऑफ गॉड' आहे. त्यामुळे आपल्या विरोधात दाखल केलेली एफआयआर रद्द करून जामीन द्यावा अशी मागणी या घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे यांनी केली आहे.

होर्डिंग पडलं हे तर देवाचं कृत्य... घाटकोपर दुर्घटनेतील आरोपीचा अजब तर्क; जामिनासाठीच्या याचिकेतील युक्तिवाद काय?
| Updated on: Jul 18, 2024 | 11:44 AM
Share

मे महिन्यात मुंबईतील घाटकोपर परिसरात घाटकोपर कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. 13 मे रोजी घडलेल्या या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झाले. याप्रकरणी मुख्य आरोपी भावेश भिंडे याला दोन दिवसांनी अटक करण्यात आली होती. दरम्यान भावेश भिंडे याने मुंबई हायकोर्टात धाव घेत जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. होर्डिंग कोसळल्याची ही दुर्घटना म्हणजे देवाचे कृत्य, ‘ॲक्ट ऑफ गॉड’ असल्याचा अजब युक्तिवाद भिंडे याने केला आहे. आपली अटक बेकायदेशीर ठरवत त्याने जामीनाची मागणी केली आहे. तसेच माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली एफआयआरही रद्द करण्यात यावा अशी मागणीदेखील भिंडे याने केली आहेय

काय आहे प्रकरण ?

घाटकोपरमध्ये जे होर्डिंग कोसळून लोक दगावले, ते इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे असून भावेश भिंडे त्याचे संचालक आहेत. यामुळे त्याला दुर्धटनेस जबाबदार ठरवून पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता भावेश याने अटकविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. 13 मे रोजी ही दुर्घटना घडली, त्यामध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 80 जण जखमी झाले. मात्र ही नैसर्गिक आपत्ती होती आणि त्यासाठी मला जबाबदार धरू नये, असा दावा भावेश भिंडे याने केला.

भिंडेंचा दावा काय ?

भिंडे यांनी होर्डींग कोसळण्याचे श्रेय देवाच्या कृतीला दिले. तसेच त्यांनी त्यांनी 12 मे रोजी जारी केलेल्या भारतीय हवामान खात्याच्या बुलेटिनचा हवालाही दिला. ज्यात त्यांनी निदर्शनास आणून दिले की, दुसऱ्या दिवशी (१३ मे)मुंबईत जोरदार वाऱ्यासह धुळीच्या वादळांचा अंदाज लावण्यात हवामान खात्याला अपयश आलं. परंतु, 13 मे रोजी दुपारी 4:15 च्या सुमारास, मुंबईत धुळीचे वादळ आलं आणि 60 किमी प्रतितास ते 96 किमी प्रति तास या वेगानं वाऱ्याचा तडाखा बसला, जे अत्यंत असामान्य होतं आणि यापूर्वी कधीही अनुभवलं नव्हतं. आयएमडीनं पुष्टी केली होती की, बीएमसीच्या स्वयंचलित हवामान केंद्रानं नोंदवलेल्या वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी होर्डिंगवर परिणाम करत होता.

वाऱ्याच्या वेगामुळेच होर्डिंग कोसळलं, पण एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, बांधकामात निष्काळजीपणा केल्यामुळे होर्डिंग कोसळलेलं नाही, असंही भिंडे यांच्या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. हे होर्डिंग पडण्यास ‘देवाची कृती’ अर्थात ‘ॲक्ट ऑफ गॉड’ कारणीभूत होती आणि हा एक दुर्दैवी अपघात होता. त्यामुळे यासाठी याचिकाकर्ता (भिंडे) किंवा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दोषी धरता येणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.

Follow Us
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.