AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या आठ गावांचा मध्यप्रदेशात जाण्याचा प्रस्ताव, का झालेत ४० हजार लोक आक्रमक?

न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे राज्य सरकारने प्रशासकावर कारभार सुरू ठेवला आहे. २०१४ नंतर याठिकाणी सार्वत्रिक निवडणूक झाली नाही. लोकप्रतिनिधी निवडणूक झाली नाही.

या आठ गावांचा मध्यप्रदेशात जाण्याचा प्रस्ताव, का झालेत ४० हजार लोक आक्रमक?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 11, 2023 | 10:38 AM
Share

गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या 8 गावांनी अनोखी मागणी केली आहे. आमगाव, बनगाव, किडंगीपार, माल्ही, पदमपुर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा ही ती आठ गाव आहेत. ही गाव सध्या गोंदिया जिल्हातील महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यांचे विलीनीकरण राज्य सीमावर्ती मध्यप्रदेश राज्यात करण्यात यावे, अशी मागण्या या लोकांनी केली आहे. शुक्रवारी या आठही गावातील लोकांनी बैलबंडी मोर्चा काढला. हजारोच्या संख्येने गावकरी या मोर्च्यात सहभागी झाले. तहसील कार्यलावर धडक मोर्चा काढत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.

8 वर्षांपासून विकास रखडला

सदर आठही गावातील लोकसंख्या जवळपास ४० हजार आहे. त्यांच्या गावांचा सीमावर्ती भाग हा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. मागील आठ वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने नगर पंचायत ते नगरपरिषद स्थापनेचा वाद निर्माण केला. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट ठेवले आहे. त्यामुळे या गावांचा विकास होत नाही. मागील आठ वर्षापासून या गावांचा विकास रखडला आहे. त्यामुळे या आठ गावांना मध्ये प्रदेश येथे विलीनीकरण करण्यात यावे, असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

मूलभूत विकासापासून रोखले

न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे राज्य सरकारने प्रशासकावर कारभार सुरू ठेवला आहे. २०१४ नंतर याठिकाणी सार्वत्रिक निवडणूक झाली नाही. लोकप्रतिनिधी निवडणूक झाली नसल्याने व योजना विकास निधी मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळे या भागाचा विकास झाला नाही. सदर भागाची भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने मागील १३ वर्षांपासून राज्य व केंद्र सरकारच्या योजना बंद केल्या. नागरिकांना मूलभूत विकासापासून रोखले आहे. या आठ गावांना मध्यप्रदेश राज्यात विलीनीकरण करून राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करावी. विकास करावा, अशी मागणी नगर परिषद संघर्ष समितीच्या वतीने यशवंत मानकर, जिल्हा परिषद सदस्य छबूताई उईके आणि संजय बहेकार यांनी केली आहे.

लोकांना घरकुल मिळण्याची मागणी

या आठ गावांतील लोकांना घरकुल मिळावे. शौचालय मिळावे तसेच इतरही लाभ मिळावे, यासाठी अनेकदा निवेदन दिले. मात्र या योजनांपासून या गावकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. त्यासाठी शासनाचा लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. बैलबंडीवर घरकुल व शौचालय तयार करत मोर्चा काढला. आपल्या मागण्या घेऊन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन दिले.

Follow Us
ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar | ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह... पहा व्हिडीओ
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा