AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अस्वलाच्या हल्ल्यात ग्रामपंचायत कर्मचारी जखमी; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना; चंदगड तालुक्यात हत्ती, गवे, बिबट्यानंतर आता पुन्हा अस्वलांचा वावर

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हत्ती, गवे, बिबट्या आणि त्यानंतर आता अस्वलांचा वावर वाढल्याने चंदगड तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करण्यात येत असून आता लोकांवर हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अस्वलाच्या हल्ल्यात ग्रामपंचायत कर्मचारी जखमी; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना; चंदगड तालुक्यात हत्ती, गवे, बिबट्यानंतर आता पुन्हा अस्वलांचा वावर
| Updated on: Feb 15, 2022 | 7:47 PM
Share

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील जंगमहट्टी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर मंगळवारी सकाळी अस्वलाने (Bear) हल्ला (Attack) केल्याने तो जखमी झाला आहे. तानाजी मानू शेळके हे जंगमहट्टी ग्रामपंचायतीमध्ये (Jangamhatti Gram Panchayat) कर्मचारी आहेत ते ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीची देखभाल करण्यासाठी गेले होते. मंगळवारी सकाळी ते गावाजवळ असणाऱ्या गायरानात टाकीतील पाणी पातळी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या झुडपात बसलेल्या अस्वलाने तानाजी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमा झाले असले तरी त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्यांना घातलेल्या जॅकेटमुळे त्यांच्या शरीरावर खोलवर जखमा झाल्या नाहीत.

अस्वलाने हल्ला करताच तानाजी शेळके यांनी आपला बचाव करण्यासाठी ते काजूच्या झाडावर चढले. त्यानंतरही त्यांच्यावर अस्वलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तानाजी शेळके यांच्या धाडसामुळे ते अस्वलाच्या हल्ल्यातून बचावल्याचे सांगण्यात येत आहे. तानाजी शेळके यांच्यावर अस्वलाने यावेळी तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ला झाल्यानंतर तानाजी यांना चंदगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बिबट्या झाला आता अस्वल

चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी हत्तींच्या कळपाकडून शेती पिकाची नासधूस तर कधी गव्यांकडून नुकसान हल्ले होत असतात. आता अस्वलांचे प्रमाण वाढल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगमहट्टी,किटवडे, कलिवडे, पाटणे, जेलगुडे, जांबरे, कोकरे आणि सडेगुडवळे परिसरातही मोठ्या प्रमाणात जंगली जनानवरांकडून शेतीचे नुकसान करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जंगमहट्टीपासून जवळच असलेल्या यशवंतनगर व तुर्केवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात आधीच खळबळ उडाली आहे. आता परत अस्वलाच्या हल्ल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

डोंगराजवळील शेती परिसरात काळजी घ्या

तानाजी शेळके यांच्यावर अस्वलाने हल्ला केला त्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती सरपंच विष्णू गावडे यांनी पाटणे वनविभागाला दिली. त्यानंतर पाटणे विभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बी. आर. भांडकोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जखमी तानाजीला चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला उपचारासाठी नेले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. जंगल परिसरात गुरे घेऊन जाताना, शेतात वावरताना स्थानिक लोकांनी सावधानी बाळगावी, असे आवाहन प्रभारी वनक्षेत्रपाल पाटील यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

राजू शेट्टी करणार महावितरणसमोर उपोषण; …आणि या मंत्र्याच्या कार्यालयावरही काढणार मोर्चा

Sanjay Raut: राऊतांच्या घोषणेतले ते ‘साडे तीन नेते’ कळाले का? प्रेस कॉन्फरन्सच्या शेवटी राऊतांनी पुढचं उत्तर दिलं

राऊतांनी भाजपच्या ज्या नेत्याचं नाव घेणे टाळलं, त्याचं नाव दरेकरांनीच उघड केलं, कोण कुणचा गेम करतंय?

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.