AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता…, गुलाबराव पाटील यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला

गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता बाळासाहेबांची भाषण दाखवून उपयोग नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता..., गुलाबराव पाटील यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला
| Updated on: Apr 18, 2025 | 8:00 PM
Share

शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपली विचारधारा सोडली आहे, त्यांनी आपल्या पक्षाचे, वडिलांचे विचार सोडले आहेत, त्यांनी आता कोणाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात आता माझ्या शिवसेनेच्या बांधवांनो व भगिनींनो अशी होते. बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात हिंदू माता भगिनींनो आणि मित्रांनो अशी होत होती. भाषणाच्या सुरुवातीचे वाक्य उद्धव ठाकरे यांनी गाडले आहे, त्यामुळे आता त्यांनी बाकीच्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही, असा टोला पाटील यांनी यावेळी लगावला आहे.

बाळासाहेबांच्या एआय भाषणावर प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता बाळासाहेबांचे भाषण दाखवून उपयोग नाही, बाळासाहेबांनी त्यावेळेस काय विचार मांडले होते. पक्ष कसा स्थापन केला होता? आणि आता आपण काय करतोय? त्यामुळे हे बाळासाहेबांचे भाषणं त्यांनीच आता पहावे असा टोला यावेळी गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख हे दैवत आहेत आणि ते दैवत सर्वांचं आहे. पण ते वारसदार फक्त प्रॉपर्टीचे आहेत, त्यांच्या विचारांचे नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्यामुळे जेवढं काम आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या काळात केलं नाही तेवढं आम्ही केलं आहे.  आदित्य ठाकरे यांनी आजोबांचा फोटो लावून स्वतःचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आम्ही आजोबांचं नाव उंचावलं आहे. आम्ही आजोबांचे विचार पुढे नेत आहोत, हाच आमचा आणि त्याच्यातील फरक आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

शालेय अभ्यासक्रमात हिंदीच्या सक्तीवरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसेनं या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता गुलाबराव पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आशिष शेलार व शिक्षण मंत्र्यांनी खुलासा केलेला आहे. राज ठाकरे यांनी या गोष्टी समजून घ्याव्यात, त्यानंतर आपण निर्णय घेऊ, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....